कोल्हापूर : ‘कोल्हापूर जिल्ह्यात ज्या -ज्या वेळी संकटे कोसळली, अडीअडचणी निर्माण झाल्या, त्या त्या वेळी शाहू छत्रपतींनी पालकत्व निभावले. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारकार्याचा वारसा खऱ्या अर्थाने जपणारे हे व्यक्तिमत्व आहे. समतेचा, सुधारणावादी विचार आणखी बुलंद करण्यासाठी शाहू छत्रपतींना प्रचंड मताधिक्क्यांनी निवडून दिल्लीला पाठवू या ’ असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील समाविष्ठ गावांत प्रचार दौऱ्यात ते बोलत होते. उचगाव येथील श्री मंगेश्वर देवालय येथे प्रचार मेळावा झाला. याप्रसंगी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती व आमदार पाटील यांनी श्री मंगेश्वर देवालयाचे दर्शन घेतले. या दोघांचा कोल्हापुरी फेटा, घोंगडे देऊन सत्कार करण्यात आला. ‘उचगाव आणि पंचक्रोशीने नेहमीच आमदार सतेज पाटील व मला पाठबळ दिले आहे. हा एकोपा कायम ठेवून लोकसभा निवडणुकीत शाहू छत्रपतींना दुप्पट मताधिक्क्य देऊ. महापूर, कोरोना या आपत्तीच्या काळासह ज्या ज्या वेळी जिल्ह्यात अडचणी उद्भवल्या, त्यावेळी शाहू छत्रपतींनी पालकत्व निभावले. संकटसमयी लोकांना आधार दिला. ’असेही आमदार पाटील यांनी नमूद केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा