कोल्हापूर: राज्य सरकारने शेतीच्या पाणीपट्टीत दहापटीने दरवाढ केली असून कृषीपंपाना जलमापक यंत्र ( पाणी मीटर ) बसविले जाणार आहेत. हे निर्णय तातडीने मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी बुधवारी शिरोली ता. हातकंणगले येथे पुणे बंगळुरू महामार्गावरील आंदोलनादरम्यान दिला.

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्यावतीने सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने वाढीव पाणीपट्टीविरोधात पुणे बंगळुरू महामार्ग रास्ता रोको आंदोलन आज करण्यात आले. दरम्यान आंदोलनस्थळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी भेट देऊन सरकारने याबाबत ६ नोव्हेंबर रोजी बैठकीचे लेखी पत्र दिले. यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेऊन ६ तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्याचे ठरले.

Ghodbunder, Citizens Ghodbunder protest,
घोडबंदरमधील नागरिकांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान परिसरात ठिय्या
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
satara police arrested couple for malpractice in majhi ladki bahin yojana
लाडकी बहीण’चा गैरफायदा घेणाऱ्या दाम्पत्यास अटक
Dangerous schools of Raigad Zilla Parishad continue
रायगड जिल्हा परिषदेच्या धोकादायक शाळा सुरूच
Opposition leader Vijay Wadettiwar criticism of the Sanjay Rathod plot case Nagpur news
मतांसाठी लाडक्या बहिणीला १५०० रुपये आणि लाडक्या मंत्र्याला ५०० कोटींचा भूखंड; संजय राठोड भूखंड प्रकरण
Controversy over the questionable stance of the grand alliance government on the Shaktipeeth highway
शक्तिपीठ मार्गावरून महायुती सरकारच्या संदिग्ध भूमिकेने वाद
Shiv Sena, BJP, Eknath Shinde, Ravindra Chavan, Konkan, Rift Between Shiv Sena and BJP in Konkan, Mumbai Goa highway, Ganeshotsav, ganesh Utsav
गोवा महामार्गाच्या मुख्यमंत्र्यांच्या पाहणी दौऱ्यात बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण बेदखल ?
Harshvardhan Patil
जिल्ह्यात महायुतीला धक्का? माजी मंत्री हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या संपर्कात असल्याची चर्चा

हेही वाचा – जनतेसाठी जीवन समर्पित करणारा नेता गमावला; राहुल गांधी यांनी पी. एन. पाटील यांच्या विषयी व्यक्त केल्या शोकभावना

एकीकडे सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तुघलकी निर्णय घेऊ लागले आहेत. तर दुसरीकडे शेतीमाल कवडीमोल दराने विकला जात आहे. दहापट वाढीव पाणीपट्टी करणारे सरकार एफ. आर. पी मध्ये तोडमोड करून तुकड्याने शेतकऱ्यांना ऊस बिले अदा करत आहेत. याबाबत सरकार मुग गिळून गप्प बसले असून पाणीपट्टी मात्र एक रक्कमी वसुलीचा तगादा लावला आहे. तोट्यातील शेतीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत. यामुळे सरकारने तातडीने याबाबत निर्णय घेऊन हे तुघलकी निर्णय मागे घ्यावे, असे राजू शेट्टी म्हणाले.

हेही वाचा – भरघाव वेगाने मोटार चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या इचलकरंजीतील युवकावर गुन्हा दाखल

यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, आमदार सतेज पाटील, आमदार अरूण लाड, मजी आमदार संजय घाटगे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किणीकर यांच्यासह सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.