कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या न्याय लढ्यासाठी कोणत्याही परिस्थितीत राजू शेट्टी रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू येथे जाणार आहेत. यामध्ये मनाई आदेश करू नये. अन्यथा आम्हाला उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, अशी मागणी राजू शेट्टी यांच्यामार्फत अ‍ॅड. असिम सरोदे यांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना केली आहे.

राजू शेट्टी यांना रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी बारसू येथे भेट देण्यास मनाई आदेश केला आहे. सोशल मीडियावरदेखील कोणत्याही प्रकारचे पोस्ट करण्यासदेखील मनाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या नोटीसला राजू शेट्टी यांनी उत्तर पाठवले आहे.

Apoorva Mukhija (Instagram)
Indias Got Latent row : अपूर्वा मखिजा, आशिष चंचलानी यांनी पोलिसांना जबाबात नेमकं काय सांगितलं?
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Sanjay Raut on Sharad pawar
Sanjay Raut : “शरद पवारांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का लावला”, संजय राऊतांची आगपाखड!
Rahul Gandhi
Rahul Gandhi : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना आवाहन; म्हणाले, “ताबडतोब…”
kapil sharma
कपिल शर्मा यशस्वी झाल्यानंतर अहंकारी झाल्याच्या दाव्यांवर सहकलाकाराचे वक्तव्य; म्हणाला, “५ टक्केसुद्धा…”
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”

हेही वाचा – कोल्हापूर : पतीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची पत्नीने तक्रार केल्यानंतर कबर खुदाई करून मृतदेह बाहेर काढला

या नोटीसमध्ये म्हटले आहे की, राजू शेट्टी यांनी चळवळीमध्ये तसेच सक्रिय राजकारणात कधीच असंसदीय शब्दांचा वापर केला नाही. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ते नेहमीच लढा देत आले आहेत. त्यांना सोशल मीडियावरदेखील प्रतिक्रिया देण्यास मनाई केली आहे. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकारानुसार राजू शेट्टींना बारसू येथे जाण्यास तसेच प्रतिक्रिया देण्याचा अधिकार आहे. शेट्टी यांच्या विरोधात काढण्यात आलेला आदेश बेकायदेशीर असून सदर मनाई आदेश तातडीने मागे घ्यावा; अन्यथा आम्हाला तुमच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल, असा इशाराही असिम सरोदे यांनी दिला आहे. तसेच राजू शेट्टी हे बारसू येथील अन्यायग्रस्तांच्या लढ्याला पाठिंबा द्यायला जाणारच असल्याचे त्यांनी कळवले आहे.

Story img Loader