कोल्हापूर, इचलकरंजी पालिकांची बेपर्वाई

दयानंद लिपारे, लोकसत्ता

young man visiting Srikshetra Olandeshwar swept away in Panganga River found dead after 20 hours
बुलढाणा : महादेवाच्या दर्शनासाठी गेलेला तरुण पैनगंगेत बुडाला; तब्बल २० तासांनंतर…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Two thieves jailed in Karnataka 86 lakhs worth of goods seized
कर्नाटकातील दोघे चोरटे जेरबंद; ८६ लाखांचा मुद्देमाल जप्त
ganeshotsav noise pollution pune marathi news,
पुण्यात गणेशोत्सवात ध्वनिप्रदूषणाचाच ‘आव्वाज’! कमाल मर्यादा पातळीचा सर्वत्र भंग; दोनशे मंडळांच्या ठिकाणी तपासणी
chhatrapati sambhaji raje slams of dhananjay munde for busy in cultural events
शेतकरी अतिवृष्टीने उध्वस्त झालेला असताना कृषीमंत्री परळीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न, छत्रपती संभाजीराजे यांची धनंजय मुंडे यांच्यावर टीका
buldhana shegaon gajanan maharaj today114th death anniversary
संतनगरी शेगावात गजानन महाराज पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ; विविध धार्मिक कार्यक्रम
imd warned vidarbha and marathwada of heavy to very heavy rain for two more days
पावसाचे संकट आणखी गडद होणार!; वादळी वारा अन् विजांच्या कडकडाटासह…
flood in wardha river
ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

कोल्हापूर : करोना टाळेबंदीच्या कालावधीत नितळ, स्वच्छ असलेली पंचगंगा नदी आणि करवीरनगरीचे जलसौंदर्य असलेला रंकाळा तलाव पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात सापडले  आहेत. जयंतीनाल्यासह १३ नाल्यांचे मैलामिश्रित सांडपाणी नदीमध्ये उघडपणे मिसळत आहे. उच्च न्यायालय, केंद्रीय हरित लवाद यांनी अनेकदा गंभीर ताशेरे मारूनही   औद्योगिक घटकांकडून होणारे नदीचे प्रदूषण थांबविण्यात कोल्हापूर महानगरपालिका वा इचलकरंजी नगरपालिके ला यश आलेले नाही.

कोल्हापूर जिल्ह्य़ाची जीवनदायिनी म्हणून पंचगंगा नदीकडे पाहिले जाते. १९८० पासून नदीच्या प्रदूषणाची तीव्रता वाढत चालली आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींकडून अनेक तक्रारी राज्य शासन, पर्यावरण विभाग, उच्च न्यायालय, हरित लवाद अशा विविध ठिकाणी करण्यात आल्या. सन २०१२ मध्ये नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी येथे काविळीची साथ येऊन ४० हून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले. हजारो लोकांना जलजन्य रोगाची लागण झाली. दरवर्षी नदीतील अगणित माणसे मृत्युमुखी पडतात, जलपर्णी साचल्यामुळे प्रदूषण वाढत राहते. याविषयी पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

‘करोना’त प्रदूषण थांबले

करोना संकट काळात सर्व घटकांवर विपरीत परिणाम झाले. अपवाद ठरली ती निसर्ग संपदा. करोना साथीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीमुळे उद्योग बंद असल्याने पंचगंगा नदीसह जलाशय स्वच्छ, नितळ झाली होती. नदीचे हे लोभस सौंदर्य नागरिक, पर्यावरणप्रेमींना सुखावणारे ठरले. नदीची दरुगधी थांबल्याने लोकांना पाणी चांगल्या दर्जाचे मिळत होते. पण हा आनंद क्षणिक ठरला. करोनाची टांगती तलवार कायम असली तरी महापालिका, नगरपालिका, उद्योग यांच्या बेपर्वाईमुळे आता पुन्हा पंचगंगेला प्रदूषित पाण्याचा विळखा पडला आहे. कोल्हापूर नदीच्या मध्यवर्ती भागातून जयंती नाला वाहतो. हा नाला म्हणजे पूर्वी नदी होती असाही एक मतप्रवाह आहे. या नाल्यातील बरगे निसटले असल्याने त्यातील तसेच अन्य १३ नाल्यांतील मैलामिश्रित सांडपाणी उघडपणे नदीत मिसळत आहे. रंकाळा तलावात प्रदूषण वाढल्याने पाणी हिरवट बनले असल्याने सौंदर्याला बाधा आली आहे. इचलकरंजी येथे काळ्या ओढय़ातून औद्योगिक, रसायनयुक्त सांडपाणी बिनदिक्कत नदीत सामावत आहे. परिणामी पंचगंगा नदीचे पाणी काळसर रंगाचे, फेसाळलेले बनले आहेत. काही ठिकाणी मासे मृत झाले आहेत. नदीवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोकाही निर्माण झाला आहे. नदीतील जैवविविधतेवरही याचा परिणाम होत असल्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत प्रजासत्ताक सामाजिक सेवा संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी तक्रार केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व नाल्यांची पाहणी करून पंचनामा केला. त्यामध्ये सर्वच नाल्यांतून सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे दिसत आले असल्याचे नमूद केले आहे.

पर्यावरणमंत्र्यांकडून अपेक्षा

याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ कोल्हापूर, इचलकरंजी पालिकांना पुन्हा एकदा कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचे या कार्यालयातून सांगण्यात आले. यापूर्वी नदी प्रदूषणास कारणीभूत ठरल्यामुळे महापालिका, नगरपालिका यांचा वीज, पाणीपुरवठा खंडित, दंड अशी कारवाई करण्यात येऊनही परिणाम शून्य आहे. इचलकरंजीतील कावीळ साथीनंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, इचलकरंजी नगरपालिका मुख्याधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमून नियमित अहवाल देण्यास सांगितले होते. त्याकडे या सर्व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. दिल्ली येथे हरित लवादासमोरील सुनावणीवेळी स्वच्छता उपासक म्हणवले जाणारे गतवर्षीचे महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून पंचगंगा नदीचे प्रदूषण होणार नाही, असे कबूल केले होते. महापालिकेचे पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे यांनी ‘जयंती नाल्याचे बरगे दुरुस्त केले जात आहे. ६० कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पातून १३ नाल्यांचे सांडपाणी मार्च २०२१ पर्यंत रोखले जाणार आहे’, असे ‘लोकसत्ता’ला सांगितले. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यात यश आलेले नाही, अशी तक्रार दिलीप देसाई यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली आहे. नवे पर्यावरणमंत्री तरी पंचगंगा नदीचे प्रदूषण थांबवणार का, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.