कोल्हापूर : आजचा काळ प्रगत वैद्यकीय सेवेचा म्हणून ओळखला जात असला तरी आजही खेडोपाड्यात जुन्या प्रथा, परंपरा याचे आचरण केले जाते. त्यातीलच एक महत्वाची प्रथा म्हणजे ‘मरीआईचा गाडा’. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावात गेली १२४ वर्षे ही प्रथा पाळली जात आहे.

जरीआई – मरीआई या देवतांना ग्रामीण भागात आजही महत्व आहे. ‘जरी’ म्हणजे तापाची साथ. ‘मरी’ म्हणजे पटकी, देवी यांसारख्या रोगांची साथ. प्राणघातक साथींच्या रोगांची एक देवी कल्पून ती ‘जरी-मरी’ वा ‘जरीआई-मरीआई’ या नावाने महाराष्ट्रात पूजिली जाते.

cheap Ayush Ayurvedic Medicine
देशभरात स्वस्तातील आयुष औषधी केंद्राचे जाळे उभारणार; केंद्रीय मंत्र्यांची माहिती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
nyaymurti mahadev govind ranade lokrang article
प्रबोधनयुगाच्या प्रवर्तकाचे विचार
Rajput Gardens
मुघल गार्डन्सची जितकी चर्चा होते, तितकी ‘राजपूत गार्डन्स’ची का होत नाही?
Gangasagar, who is now a 65-year-old ‘Aghori’ known as Baba Rajkumar
आश्चर्यच! २७ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला व्यक्ती महाकुंभमेळ्यात भेटला, पण…; कुटुंबाने केली डीएनए चाचणीची मागणी!
Buldhana, illegal biodiesel, Mumbai squad ,
बुलढाणा : ७१ लाखांचे अवैध बायोडिझेल टँकरसह जप्त! मुंबईच्या पथकाची ‘हाय-वे’वर कारवाई
Widow practice, villages , Kolhapur,
कोल्हापुरातील दोन गावात विधवा प्रथा बंद, भेदभावाला मूठमाती देण्याचा ग्रामसभेचा निर्णय
street light repair issues in Ambernath,
पथदिव्यांची देखभाल दुरूस्ती वाऱ्यावर; अंबरनाथकरांना सोसावी लागतेय अंधारयात्रा 

हेही वाचा – कोल्हापूर : चंद्राबाबू नायडू सपत्निक महालक्ष्मीच्या चरणी, मोदींचे सरकार येण्याचा विश्वास

१९ वे शतक सुरु होत असताना कोल्हापुरात आलेल्या महाभयानक प्लेग रोगाने गावात प्रवेश करू नये यासाठी तेव्हापासून आजपर्यंत पन्हाळा तालुक्यात ‘मरीआईचा गाडा’ ओढला जातो. मान्सूनला सुरुवात होण्याआधी गावातील नागरिक एकत्र येऊन मरीआईची पूजा करतात. श्रीफळ, नारळ, साखर, आंबील, घुगऱ्याचा नैवेद्य दाखवून हलगीच्या तालावर तो गाडा दुसऱ्या गावच्या हद्दीमध्ये सोडून दिला जातो. दुसऱ्या गावातून तो गाडा पुढे-पुढे जात शेवटी तो जंगलात सोडून दिला जातो.

हेही वाचा – कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेचे सांडपाणी प्रक्रियेविना पंचगंगेत; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातील माहिती

आजही आबालवृद्ध या परंपरेत सहभागी होतात, गावाला रोगराईपासून दूर ठेवावे ही यामागची श्रद्धा आहे, असे ज्येष्ठ नागरिक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

Story img Loader