कोल्हापूर : आजचा काळ प्रगत वैद्यकीय सेवेचा म्हणून ओळखला जात असला तरी आजही खेडोपाड्यात जुन्या प्रथा, परंपरा याचे आचरण केले जाते. त्यातीलच एक महत्वाची प्रथा म्हणजे ‘मरीआईचा गाडा’. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावात गेली १२४ वर्षे ही प्रथा पाळली जात आहे.

जरीआई – मरीआई या देवतांना ग्रामीण भागात आजही महत्व आहे. ‘जरी’ म्हणजे तापाची साथ. ‘मरी’ म्हणजे पटकी, देवी यांसारख्या रोगांची साथ. प्राणघातक साथींच्या रोगांची एक देवी कल्पून ती ‘जरी-मरी’ वा ‘जरीआई-मरीआई’ या नावाने महाराष्ट्रात पूजिली जाते.

Mumbai political hoardings ganeshotsav 2024
मुंबई: राजकीय फलकबाजी; गणेशोत्सव काळात न्यायालयाच्या आदेशांचा विसर
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Ganesh utsav, Manmad-Kurla Godavari Express,
मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेसमधील गणेशोत्सव परंपरा खंडित, रेल्वे प्रशासनाचा असहकार
Lalbagh Ganesh utsav Mandal, Lalbagh Ganesh,
पहिल्याच दिवशी लालबाग गणेशोत्सव मंडळाच्या दानपेटीत कोट्यवधींचे दान
low pressure belt, Bay of Bengal,
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, हवामान खात्याचा इशारा काय?
Ganesha, rain, rain forecast, rain maharashtra,
पावसाच्या सरींमध्ये गणरायाचे आगमन? जाणून घ्या, राज्यभरातील शनिवारचा पावसाचा अंदाज
Guhagar, leopard cub, Guhagar school leopard cub,
रत्नागिरी : गुहागरात शाळकरी मुले चक्क बिबट्याच्या पिल्लाला खेळवत असल्याचा धक्कादायक प्रकार, पाहा VIDEO
Panzara river, Dhule, bridges under water Dhule,
धुळे : पांझरा नदीच्या पुरामुळे धुळ्यात दोन पूल पाण्याखाली – नागरिकांना सतर्कतेचा इशारा

हेही वाचा – कोल्हापूर : चंद्राबाबू नायडू सपत्निक महालक्ष्मीच्या चरणी, मोदींचे सरकार येण्याचा विश्वास

१९ वे शतक सुरु होत असताना कोल्हापुरात आलेल्या महाभयानक प्लेग रोगाने गावात प्रवेश करू नये यासाठी तेव्हापासून आजपर्यंत पन्हाळा तालुक्यात ‘मरीआईचा गाडा’ ओढला जातो. मान्सूनला सुरुवात होण्याआधी गावातील नागरिक एकत्र येऊन मरीआईची पूजा करतात. श्रीफळ, नारळ, साखर, आंबील, घुगऱ्याचा नैवेद्य दाखवून हलगीच्या तालावर तो गाडा दुसऱ्या गावच्या हद्दीमध्ये सोडून दिला जातो. दुसऱ्या गावातून तो गाडा पुढे-पुढे जात शेवटी तो जंगलात सोडून दिला जातो.

हेही वाचा – कोल्हापूर, इचलकरंजी महापालिकेचे सांडपाणी प्रक्रियेविना पंचगंगेत; प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातील माहिती

आजही आबालवृद्ध या परंपरेत सहभागी होतात, गावाला रोगराईपासून दूर ठेवावे ही यामागची श्रद्धा आहे, असे ज्येष्ठ नागरिक पी. आर. पाटील यांनी सांगितले.