कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मंगळवारी पाणलोट क्षेत्रात पावसाचा मुक्काम कायम असल्याने नदी, धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील ४६ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. गेले तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.

आज पावसाचे प्रमाण काहीसे कमी होते. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी येत होत्या. पश्चिमेकडील पाणलोट क्षेत्रात अजूनही मुसळधार पाऊस पडत आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक ७० मिमी पाऊस झाला. याशिवाय, पन्हाळा, शाहूवाडी, करवीर, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यांत चांगला पाऊस पडला.

rainfall in koyna dam marathi news
कोयना धरणक्षेत्रातील पावसाने वार्षिक सरासरीही टाकली मागे
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Dahi Handi Kolhapur, Kolhapur rain,
कोल्हापुरातील दहीहंडीवर राजकीय प्रभाव; पावसातही उत्साह
kolhapur mahayuti marathi news
कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीची साथ सोडून सहकारातील बडे नेते पुन्हा महाविकास आघाडीत
sharad pawar criticized hasan mushrif
“ज्यांना मोठं केलं, तेच संकटकाळी सोडून गेले, त्यांचा आता…”; नाव न घेता हसन मुश्रीफांवर शरद पवारांचा हल्लाबोल!
loksatta editorial Reserve Bank of India predicted GDP over 7 2 percent for fy 25
अग्रलेख: करणें ते अवघें बरें…
Stormy rain in Satara city
सातारा शहरात ढगफुटीसदृश वादळी पाऊस
Koyna Dam, rainfall, Satara, water inflowed Koyna Dam,
सातारा : कोयना धरणात यंदा आजवर १४१ अब्ज घनफूट जल आवक, वार्षिक सरासरीच्या ११० टक्के पाऊस

हेही वाचा – कोल्हापुरातील दहीहंडीवर राजकीय प्रभाव; पावसातही उत्साह

राधानगरी धरणात ८.२३ टीएमसी पाणीसाठा आहे. हे धरण भरले असून, त्याचे तीन दरवाजे खुले केले आहेत. त्यातून ५७८४ क्युसेक विसर्ग सुरू आहे. वारणा धरणातून ३८६५ क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. नदीकडेच्या लोकांनी दक्ष राहावे, असा इशारा मंगळवारी वारणा धरण व्यवस्थापनाने दिला आहे. जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांच्या संख्येत आज आणखी वाढ झाली असून, ही संख्या ४६ झाली आहे.

हेही वाचा – बँकेचे धनादेश समाशोधन त्याच दिवशी होणार; रक्कम तत्काळ जमा होणार

अणुस्कुरा घाटात दरड कोसळली असल्याने कोल्हापूर – कोकण मार्गावरील वाहतूक रविवारपासून विस्कळीत झाली होती. कोसळलेला भाग दूर करण्याचे प्रयत्न गतीने सुरू झाले आहेत. आता या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू झाल्याने प्रवासी, वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.