कोल्हापूर : गुन्हे दाखल झालेल्या ऊस तोडणी मुकादमांवर कारवाई बाबत लवकरच गृह विभागाची बैठक आयोजित करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्याशी बोलताना दिले. गेल्या वर्षभरामध्ये राज्यात सुमारे २ हजारहून अधिक ऊस वाहतूकदारांच्या तक्रारीवरून आर्थिक फसवणूक केलेल्या ऊस तोडणी मुकादमांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत.

यासंदर्भात राज्य शासनाने बैठक आयोजित करून वसुलीसंदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मंत्रालयात वाहतूकदार शिष्टमंडळासोबत भेट घेऊन केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त आश्वासन दिल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

Police Commissioner Amitesh Kumar statement regarding Rahul Solapurkar statement
राहुल सोलापूरकर यांच्या ‘त्या’ विधाना प्रकरणी गुन्हा दाखल होणार का? पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचं मोठं विधान…
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Increase in looting incidents in Pune city crime news Pune news
पुणे: शहरात लुटमार करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ
thane arrest
डोंबिवली, बदलापूर, ठाण्यामध्ये ५० घरफोड्या करणारा सोलापुरचा सराईत चोरटा अटकेत; ६६ तोळे सोने, ५४ लाखाचा ऐवज जप्त
thane municipality removed over 8000 illegal banners in 11 months to tackle city disfigurement
ठाण्यात ८ हजाराहून अधिक बेकायदा बॅनरवर कारवाई, बेकायदा बॅनरबाजी करणाऱ्या १२५ जणांवर गुन्हे दाखल
raigad district police arrested two police persons robbed bullion businessman crore rupees crime news police alibag
पोलीसांच्या मदतीने सराफांना दीड कोटींना लुटले, दोन पोलीसांसह चौघांना अटक, रायगडच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Vacant posts of police officers in the maharashtra state
राज्यात पोलीस अधिकाऱ्यांची शेकडो पदे रिक्त; कायदा व सुव्यवस्था धोक्यात : तपासावरही परिणाम
Shanti Nagar police arrested gang diverting cyber fraud money into accounts of unemployed individuals
सायबर गुन्हेगारांचे पैसे अशिक्षित, बेरोजगारांच्या खात्यात, भिवंडी शहरातून सायबर गुन्हे करणारी टोळी गजांआड

राज्यातील ऊस तोडणी मुकादमावर गुन्हे दाखल होवूनही पोलीस यंत्रणेकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही. राज्यातील काही बड्या नेत्यांच्या वरदहस्तामुळे फसवणूक केलेले मुकादम बिनबोभाट फिरत आहेत, असा आरोप करून शेट्टी यांनी याबाबतचे गुन्हे निपटारा होण्यासाठी कालहरण होत असल्याने बँका, पतसंस्थांच्या मुद्दल, व्याजाचा भुर्दंड बसून उस वाहतूकदार आर्थिक अडचणीत आल्याचा मुद्दा चर्चेवेळी मांडला. संदीप राजोबा, राजू पाटील, रावसाहेब अबदान, दादा पाटील, विनोद पाटील, तानाजी पाटील यांचेसह वाहतूकदार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Story img Loader