कोल्हापूर : शेतकऱ्याने पंजा मारण्याआधीच शेतक-याच्या डरकाळीचा आवाज ऐकुन शासनाने आज ऊस निर्यात बंदी आध्यादेश मागे घेतला आहे, अशी खरमरीत प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. राज्य शासनाने १४ सप्टेंबर रोजी एप्रिल २०२४ पर्यंत परराज्यात ऊस नेण्यास मनाई करणारा अध्यादेश लागू केला होता. या विरोधात शेतकरी संघटनांनी आवाज उठवला होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही यासंदर्भात आंदोलन सुरू केले होते. मात्र राज्य शासनाने नवी अधिसूचना काढून आपला पूर्वीचा निर्णय मागे घेतला असून निर्यात बंदी पासून मागे जाण्याचे ठरवले आहे.

हेही वाचा >>> ‘गोकुळ’वरून राजकीय कुरघोड्या सुरूच

Solapur jowar crops loksatta news
सोलापूर : ज्वारीच्या कोठारात यंदा ज्वारीचा पेरा निम्म्यावर, लांबलेल्या पावसाचा परिणाम
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Cow milk subsidy of Rs 57 crores to farmers in Satara news
साताऱ्यातील शेतकऱ्यांना ५७ कोटींचे गायीच्या दुधाचे अनुदान
Announcements of organic natural farming Know how much the use of urea and other fertilizers has increased Mumbai news
सेंद्रीय, नैसर्गिक शेतीच्या फक्त घोषणाच; जाणून घ्या, युरियासह अन्य खतांचा वापर किती वाढला
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
centre attempts to revive farm reforms unveils draft policy
शेतीमालाच्या विक्री धोरणाबाबत केंद्राची पुन्हा घाई; सूचना, हरकतींसाठी वेळ वाढवून देण्याची मागणी
pune municipality suffered financial loss due to state government decision
Pune Municipal Corporation : महापालिकेला का सोसवेना समाविष्ट गावांचा भार, काय आहे नक्की कारण?
After soybeans price of cotton become big issue for farmers in Vidarbha
विदर्भात कापसाचे अर्थकारण विस्‍कळीत

या निर्णयावर बोलताना  शेट्टी म्हणाले,राज्य सरकारला कायदेशीर अधिकार नसताना साखर कारखानदारांचा लाळघोटेपणा करत शेतक-यांनी परराज्यात ऊस न देण्याचा अध्यादेश काढला. या अध्यादेशाच्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने संपुर्ण राज्यात आदेशाची होळी करत बंदी आदेश झुगारून शेतक-यांनी ऊस घालण्याची भुमिका घेतली. यामध्ये सरकारची नामुष्की होणार हे लक्षात आल्याने शेतक-याने पंजा मारण्याआधीच शेतक-याच्या डरकाळीचा आवाज ऐकुण शासनाने आज बंदी आध्यादेश मागे घेतला आहे.

Story img Loader