लोकसत्ता प्रतिनिधी

कोल्हापूर: वर्षा पर्यटनासाठी रांगणा किल्ल्यावर १७ पर्यटकांना दीर्घ प्रयत्नानंतर सुखरूपरीत्या बाहेर काढण्यात आले. इतकी मोठी घटना भर पावसात घडत असताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे पथक मात्र मोहीम पूर्ण झाल्यानंतर तेथे पोहोचले. यातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वरती मागून घोडे प्रकाराचा प्रत्यय आला.

readers comments on Loksatta editorial
लोकमानस : रेल्वे आता सेवा नव्हे उद्योग
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
४१ इमारतींवरील कारवाईला वेग ,एकाच दिवसात ४ इमारती जमीनदोस्त
fountain , Chandrapur , mosquitoes,
चंद्रपुरातील कारंजी बनली डास उत्पत्ती केंद्र
Navi Mumbai , APMC , Unauthorized Construction ,
नवी मुंबई : एपीएमसीतील अनधिकृत बांधकामाला प्रशासनाचे अभय? कारवाई करून देखील धान्य बाजारातील अनधिकृत बांधकाम सुरूच
vasai virar municipal corporation Planning of development plan according to 10 sectors
विकास आराखड्याचे १० विभागानुसार नियोजन, आरक्षित भूखंडावर अतिक्रमणाबाबत महापालिकेचे मौन
Hair loss and baldness cases reported in 11 Shegaon villages unsafe water found in Matargaon
टक्कलग्रस्त माटरगावमधील पाणी अपायकारक! ‘नायट्रेट’चे जास्त प्रमाण
State government approves subsidy of Rs 165 crore for orange producers
संत्री उत्पादकांसाठी १६५ कोटींचे अनुदान, राज्यशासनाची मंजुरी

भुदरगड तालुक्यातील किल्ले रांगणा येथे पर्यटनासाठी कोल्हापूर, कागल, हुपरी येथील १७ पर्यटक गेले होते. सायंकाळी तेथून परत येत असताना भटवाडी येथील ओढ्यावर पाणी आल्याने ते अडकून पडले.

आणखी वाचा-कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपाची जबाबदारी तरुण नेतृत्वावर; विजय जाधव, राहुल देसाई, राजवर्धन निंबाळकर यांची वर्णी

तहसीलदार अश्विनी अडसूळ यांनी अंतुर्लीचे सरपंच रामदास देसाई यांना ओढ्याच्या बाजूने जाऊ देऊ नका असे सुचवले. त्यामुळे त्यांनी पर्यटकांना तेथे थांबून घेतले. त्यातूनही दोघेजण जीवावर उदार होऊन दोरीच्या साह्याने ओढ्या पलीकडे गेले. तर मध्यरात्री ओढ्याचे पाणी कमी झाल्यानंतर एका महिलेसह उर्वरित पर्यटकांना सुरक्षित स्थळी आणण्यात आले.

प्रशासनाला जाग

ही घटना घडल्यानंतर तेथे वनविभागाने रांगणा किल्ला जाण्यास मज्जाव केल्यास त्याचा फलक लावला आहे. रांगणा किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती सायंकाळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे. तसे माहिती फलक भटवाडी, वाघ वहाळ व तांब्याच्या वाडी याठिकाणी लावण्यात आल्याचे भुदरगड तहसिलदार अश्विनी अडसूळ यांनी सांगितले.

आपत्ती व्यवस्थापनाचा बोजवारा

रांगणा किल्ला पर्यटनासाठी गेलेले पर्यटक मध्यरात्री वेळी अडकून पडले असताना त्यांच्या बचावासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने कार्यक्षमपणे घटनास्थळी पोहोचून मदत करणे अपेक्षित होते. मात्र हे पथक बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर तेथे पोहोचले. याविषयी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी प्रसाद संकपाळ यांना वारंवार विचारणा करून त्यांनी माहिती देण्याचे टाळले.

Story img Loader