कोल्हापूर : छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’च होते. त्यांच्या या गौरवाबद्दल इतिहासात अनेक संदर्भ आहेत. मात्र असा कुठलाही अभ्यास न करता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मांडलेला हा मुद्दा पूर्णपणे चुकीचा आहे, या शब्दांत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्यावर टीका केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळात बोलताना छत्रपती संभाजी महाराज हे ‘धर्मवीर’ नव्हते, तर ‘स्वराज्य रक्षक’ होते, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या विधानावर राज्यात सध्या सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. याच मुद्दय़ावर संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

आणखी वाचा – ‘संभाजी महाराज धर्मवीर नव्हते’ म्हणणाऱ्या अजित पवारांवर संभाजीराजे संतापले; म्हणाले “विकृत…”

Ranji Trophy Himanshu Sangwan Revealed Bus Driver Gives Surprise Advice To Dismiss Virat Kohli
Ranji Trophy: “विराटला बाद करायचंय तर चेंडू…”, बस ड्रायव्हरने दिला किंग कोहलीला बाद करण्याचा सल्ला, हिमांशू सांगवानचा मोठा खुलासा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Australia’s Mitchell Marsh ruled out of Champions Trophy 2025
Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू झाला संघाबाहेर; काय आहे कारण?
Chhaava
जेव्हा विकी कौशलला पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांच्या पेहरावात पाहिलं तेव्हा…; अभिनेता संतोष जुवेकर म्हणाला, “कोणी गोरागोमटा…”
Santosh Juvekar
“डोळ्यात पाणी…”, ‘छावा’मधील राज्याभिषेकाच्या सीनबाबत संतोष जुवेकर म्हणाला, “विकी कौशलची एन्ट्री…”
Actor Ashok Saraf conferred with Padma Shri
Ashok Saraf : अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर, विनोदाच्या अनभिषिक्त सम्राटाचा सन्मान
Satguru Mata Sudiksha
मानवीय गुणांनी युक्त असणे हीच मानवाची खरी ओळख – माता सद्गुरू सुदीक्षाजी महाराज
Ranji Trophy Maharashtra Ankit Bawne Handed One Match Ban After Refusing To Leave The Field Against Services
Ranji Trophy: महाराष्ट्राच्या खेळाडूवर रणजी ट्रॉफीत एका सामन्याची घातली बंदी, काय आहे नेमकं प्रकरण?

ते म्हणाले, की संभाजी महाराज यांनी त्यांच्या एकूण कार्यकर्तृत्वातून हिंदू धर्माचेच रक्षण केले आहे. अगदी त्यांनी मृत्यू स्वीकारला परंतु धर्माला अंतर दिले नाही. यातूनच त्यांना इतिहासापासूनच ‘धर्मवीर’ या नावाने ओळख मिळाली आहे. त्यांचे हे अद्वितीय कार्य, त्याग याची जाणीव न ठेवता कुठलाही अभ्यास न करता अचानकपणे कुणीतरी ते आजपासून ‘धर्मवीर’ नाहीत हे विधान करणे भयंकर आहे. असा प्रयत्नही कुणी करू नये. अजित पवार हे अर्धसत्य, दिशाभूल करणारे बोलतात. संभाजी महाराज ‘स्वराज्यरक्षक’ होतेच, परंतु हे स्वराज्य कुठले होते? तर ते ‘हिंदूवी स्वराज्य’ आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या या ‘हिंदूवी स्वराज्या’चे रक्षण करण्यासाठी इतर मावळय़ांप्रमाणेच संभाजी महाराज यांनीदेखील आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. या कार्यातूनच त्यांना ‘धर्मवीर’ म्हटले जाऊ लागले आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

Story img Loader