लोकसत्ता प्रतिनिधी

कोल्हापूर: मंत्री हसन मुश्रीफ यांना टाळी देण्यास कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सतेज पाटील यांनी नकार दिला. यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात हसन मुश्रीफ व सतेज पाटील या खासा दोस्ताना असलेल्या दोन प्रमुख नेत्यांच्या वाटा वेगळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Priyanka Gandhi On Narendra Modi
Priyanka Gandhi : “असे रडणारे नेते कधीही पाहिले नाहीत”, प्रियांका गांधींचं पंतप्रधान मोदी, केजरीवालांना जोरदार प्रत्युत्तर
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Bhokardan , Raosaheb Danve,
‘माजी’ झाल्याने फरक पडत नाही, फक्त नाव पुरेसे, माजी खासदार रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Chandrashekhar Bawankule statement on Criteria for opposition leaders to join ruling party
सत्ताधारी पक्षात प्रवेशासाठी विरोधी पक्षातील नेत्यांसाठी ‘हे’ निकष… चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

हसन मुश्रीफ यांना मंत्रिपद मिळाल्यावर गेल्या आठवड्यात त्यांनी सतेज पाटील यांनी सोबत यावे; तरच त्यांच्याशी मैत्री राहील, अशा शब्दात टाळीसाठी हात पुढे केला होता. मात्र आज कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीत झालेल्या एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सतेज पाटील ‘मुश्रीफ यांनी सोबत येण्याचे आवाहन केले असले तरी मी महायुती सोबत जाणे शक्य नाही,’ अशा शब्दात टाळीस प्रतिसाद देण्याचे टाळले.

आणखी वाचा-कोल्हापूर : धार्मिक पेहरावाच्या मुद्द्यावरून इचलकरंजीतील महाविद्यालयात दोन समाजाच्या समर्थकांत वाद

देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भावी मुख्यमंत्री फलक लावले गेले आहेत. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सतेज पाटील यांनी ‘कोल्हापूरच्या जनतेच्यावतीने दोन्ही मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. पण मुख्यमंत्री होण्याचा निर्णय हा येथे नाही तर दिल्लीत होतो. दिल्लीकरांच्या मनात काय चालले आहे; यावरच गोष्टी ठरतात’, असा खोचक टोला लगावला.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडले असली तरी काँग्रेस पक्ष एकसंघ आहे. देशाच्या आणि राज्यात राजकारणात काँग्रेस विश्वास देऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

Story img Loader