कोल्हापूर : राज्यातील जनतेसमोर महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. लोकांना स्थिर सरकार हवे आहे. लहान पक्षांचा टेकू नको आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत जनता तिसरी आघाडी स्वीकारणे कठीण आहे, असा विश्वास विधान परिषदेतील गटनेते, आमदार सतेज पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवर सतेज पाटील म्हणाले, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. वाचाळवीरांच्या वक्तव्याला त्यांच्याच भाषेत आम्ही उत्तर देऊ शकतो, पण ती कॉंग्रेसची संस्कृती नाही. भाजपच्या ५ खासदारांनीच त्यांचे सरकार घटना बदलणार असल्याचे म्हटले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली ही घटना अबाधित राहिली पाहिजे ही भूमिका राहुल गांधीनी मांडली. याची सत्यता लोकांनाही माहीत आहे.

Supriya Sule And Rashmi Thackeray
Varsha Gaikwad : “….तर रश्मी ठाकरे आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील”, काँग्रेस खासदाराचं वक्तव्य चर्चेत
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Loksatta editorial on Chief Economic Advisor Dr V Anantha Nageswaran talk about financial market and finance 3 0 summit
अग्रलेख: बुडबुडा बुडवे बहुतां…
Ulhas bapat modi cji meeting
PM Modi : “पंतप्रधानांनी सरन्यायाधीशांच्या घरी जाणं मोठी चूक”, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांनी सांगितले नियम
Himachal Pradesh Assembly
Himachal Pradesh : काँग्रेसच्या मंत्र्याचं भाषण ऐकताच भाजपा आमदारांचा जल्लोष, तर मुख्यमंत्री स्तब्ध; हिमाचलच्या विधानसभेत काय घडलं?
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Haseeb drabu on jammu Kashmir vidhan sabha election
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्रीपद शोभेचे बाहुले!
Storm Shadow cruise
‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ क्षेपणास्त्र किती घातक? युक्रेनला या क्षेपणास्त्राने रशियावर हल्ला करण्याची परवानगी का नाही?

हेही वाचा >>>केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी कागदावर! निधीच्या केवळ घोषणाच, चौकशी समितीकडून यंत्रणाही दोषमुक्त

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीमध्ये जागावाटपावरून बरेच वाद आहेत. अनके जिल्ह्यांत त्यांच्यात भांडणे आहेत. दुसरीकडे मविआत उत्तम समन्वय असून कोणतेही वाद नाहीत. बऱ्याच जागांवर एकमत झाले आहे. शंभरएक जागांवर चर्चा सुरु आहे. लोकसभेप्रमाणे एकमताने यावेळीही निवडणूक लढवू. मतदार महाविकास आघाडीच्या बाजूनेच कौल देईल, असेही पाटील म्हणाले.