कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे राधानगरी धरण पूर्ण भरले असून दूधगंगा या सर्वात मोठ्या धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. यामुळे पूरस्थितीत वाढ होऊ लागली असल्याने नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्याला पावसाने झोडपून काढायला सुरुवात केली आहे. पावसामुळे राधानगरी धरण काल पूर्ण भरले होते. पहिला दरवाजा सकाळी उघडण्यात आला होता. सायंकाळी पाच दरवाजे उघडले होते. तर शुक्रवारी आणखी एक दरवाजा उघडण्यात आला पण सायंकाळी त्यातील एक दरवाजा बंद करण्यात आल्याने सध्या पाच दरवाजे उघडले असून त्यातून साडेतीन हजार क्युसेस विसर्ग सुरू आहे. तर सर्वात मोठ्या दूधगंगा (काळमवाडी) धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने जलाशय परिचलन सूची प्रमाणे पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी सांडव्यावरून साडेतीन हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला.

Hatnur, Aner, Jalgaon, Dhule, water release Hatnur,
अनेर, हतनूरमधून विसर्गामुळे जळगाव, धुळ्यातील नदीकाठच्या नागरिकांना इशारा
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
heavy rain in Dharashiv district,
धाराशिव जिल्ह्याला पावसाने झोडपले; रस्ते पाण्याखाली, तेरणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Nagasakya Dam on Panzhan River remains dry even in heavy rains
मुसळधार पावसातही कोरड्या धरणाची कथा…
Sangli, Koyna, Chandoli Dam, flood,
सांगली : कोयना, चांदोली धरणातील विसर्गात वाढ; पाणलोट क्षेत्रात संततधार, कृष्णा, वारणा नद्यांना पूर
Rain Kolhapur. Kolhapur river, Kolhapur dam,
कोल्हापुरात पावसाचा मुक्काम कायम : नदी, धरणातील पाणी पातळीत वाढ
Panzara river, Dhule, bridges under water Dhule,
धुळे : पांझरा नदीच्या पुरामुळे धुळ्यात दोन पूल पाण्याखाली – नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Nashik, heavy rain in nashik, heavy rains, dam release, Godavari River, Gangapur dam, Darana dam, flooding, Ghatmatha, waterlogging, irrigation department,
नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर; गोदावरी, दारणा, कादवा नद्या दुथडी भरून
दूधगंगा धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे.

हेही वाचा – कोल्हापूर : राष्ट्रपती रविवारी वारणेच्या दौऱ्यावर; पाऊस झेलत शासकीय यंत्रणा कार्यरत

हेही वाचा – पंचगंगा धोका पातळीच्यावर कायम; सांगलीतील ८० कैदी कोल्हापुरात हलवले

शासन सतर्क

दोन्ही धरणातून अधिक पाणी वाहू लागल्याने पूरस्थितीत वाढ होत चालली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पुराचा फटका बसलेल्या भागातील लोकांनी स्थलांतर करण्याचे आवाहन शुक्रवारी केले.