कोल्हापूर : ऊस दर प्रश्नी तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित केलेली तिसरीही बैठक निष्फळ ठरली. साखर कारखानदारांनी दिलेला प्रस्ताव अमान्य असल्याचे सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रविवारी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा केली.मागील वर्षीच्या ऊस गळीत हंगामासाठी प्रतिटन एफआरपी पेक्षा ४०० रुपये अधिक द्यावेत आणि चालू गळीत हंगामासाठी एफआरपी एक रकमी ३५०० रुपये द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे गेले तीन आठवडे कारखान्याचे गाळप थांबले आहे.  ऊस पट्ट्यामध्ये कमालीची अस्वस्थता आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांनी साखर कारखानदारांचे प्रतिनिधी व शेतकरी संघटना यांच्या बैठका घेतल्या होत्या. मात्र त्यामध्ये कोणताही निर्णय झाला नव्हता.

आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुढाकाराने बैठक झाली. आमदार सतेज पाटील, माजी आमदार के. पी.  पाटील, गणपतराव पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, माधवराव घाटगे, राहुल आवाडे आदी साखर कारखान्याचे प्रतिनिधी तसेच  जिल्हाधिकारी राहुल रेखावर, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, साखर सहसंचालक अशोक गाडे आदी अधिकारी उपस्थित होते. 

Delhi Assembly Elections 2025 Seven AAP MLAs resign
‘आप’च्या सात आमदारांचे राजीनामे; पक्ष नेतृत्व विचारसरणीपासून दूर जात असल्याचा आरोप
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
rules for RTE admissions Change, Committee Education Department
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
Navi Mumbai, Re-survey, constructions ,
नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांचे पुन्हा सर्वेक्षण, सिडको मंडळाकडून सर्वेक्षणासाठी ५५ कोटी रुपये खर्च
youths Ambernath questions republic day hoardings future corporators
प्रजासत्ताकदिनी तरूणांनी वेधले लक्ष ; प्रजासत्ताक दिनाचे बॅनर का नाहीत, भावी नगरसेवकांना सवाल
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
waqf bill
‘वक्फ विधेयक’ आगामी अधिवेशनातच, येत्या दोन दिवसांत अहवालावर शिक्कामोर्तब
guardianship of Akola district is with Adakash Fundkar print politics news
अकोल्याला सलग चौथ्यांदा बाहेरची पालकमंत्री; समन्वय राखून प्रश्न मार्गी लावण्याचे आव्हान

हेही वाचा >>>मटन खरेदीसाठी कोल्हापूरकरांच्या रांगा; भाऊबीज झणझणीत होणार

मागील रकमेवर बिनसले

बैठकीला सुरुवात होताच दराच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाल्याने शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी बैठक सोडण्याचा निर्णय घेतल्याने तणाव निर्माण झाला होता.  हा वाद पोलिसांनी थांबवला. यावर्षीच्या हंगामासाठी काही रक्कम वाढवून देण्याची तयारी साखर कारखानदारांनी दर्शवली. आधी मागील वर्षीच्या गाळपसाठी अधिक रक्कम किती देणार हे पहिला स्पष्ट करा, या मुद्द्यावर राजू शेट्टी आग्रही राहिले. त्यावर अखेरपर्यंत तोडगा निघू शकला नसल्याने ही तिसरी बैठक निष्फळ ठरली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची एक समिती शेतकऱ्यांना अधिक रक्कम कशी देता येईल याचा निर्णय घेणार आहे. ही समिती मान्य नसल्याचे शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितले. ऊस तोडी बंद आंदोलन सुरू राहणार असून तीव्रता वाढवण्यासाठी रविवारी राज्यभर सर्वत्र चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Story img Loader