कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील ऊसाला एफआरपी शिवाय जादा  दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रूपये देण्याच्या मागणीसाठी गुरुवारी येथे झालेली बैठक निष्फळ ठरली. हि रकम देण्यास साखर कारखानदारांनी  नकार दिला. यामुळे या प्रश्न हंगामापूर्वी तापण्याची चिन्हे आहेत.

शेतकरी संघटनांच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली साखर कारखानदार व शेतकरी संधटनांची बैठक झाली. स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष  प्रा. डॅा. जालंदर पाटील , सावकर मादनाईक यांचेसह कारखान्याचे चेअरमन , कार्यकारी संचालक , साखर सहसंचालक अशोक गाडे , विविध संघटनांचे प्रतिनिधी ऊपस्थित होते.

india sugar production declines by 2 million tonnes
देशांतर्गत साखर उत्पादनात २० लाख टनांची घट; घट ४० लाख टनांवर जाण्याची भीती
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
share market update bse nifty share bazar stock market
Marker roundup : ‘सेन्सेक्स’मध्ये सलग दुसऱ्या सत्रात मजबूत ६३१ अंशांची भर; दलाल स्ट्रीटवरील आजच्या तेजीमागील दडलंय काय?
How much sugar has been produced in Maharashtra and how much will be produced Mumbai print news
राज्याने साखर उत्पादनाचा महत्त्वाचा टप्पा गाठला; जाणून घ्या, साखर उत्पादन किती झाले, किती होणार 
Record daily collection of 1 crore 71 lakh liters of milk in the financial year
राज्यात दुधाचा ‘महापूर’; गत आर्थिक वर्षात १ कोटी ७१ लाख लिटरचे दैनंदिन विक्रमी संकलन
low prices of tur in market
विश्लेषण : बाजारपेठेत तुरीच्या घसरणीमुळे शेतकऱ्यांशी कोंडी कशी?
How much sugar will be exported from Maharashtra mumbai news
दहा लाख टन साखर निर्यातीला परवानगी; जाणून घ्या, महाराष्ट्रातून किती साखर निर्यात होणार
New decision regarding ethanol production from corn Mumbai news
सहकारी साखर कारखान्यांना मोठा दिलासा; जाणून घ्या, मक्यापासून इथेनॉल निर्मिती बाबतचा नवा निर्णय

हेही वाचा >>>कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाडीला विरोध करत १८ गावांमध्ये बंद; व्यवहार ठप्प

हिशोब पूर्ण करावा –  जिल्हाधिकारी

 वारवांर आंदोलने करून  पैसे मिळत नसतील तर मोठा संघर्ष सुरू होईल,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आतापर्यंत राज्यातील ८ साखर कारखान्यांनी एफआरपी पेक्षा जादा दर दिलेले आहेत.  कोल्हापुरातील कारखाने सक्षम असून ऊस दर नियंत्रणाच्या मान्यतेची तांत्रिक अडचण सांगून दुसरा हप्ता देण्यास टाळाटाळ करत आहेत, असा आरोप केला. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी १५ सप्टेंबर पुर्वी हिशोब पुर्ण करण्याचा आदेश जिल्हाधिकारी रेखावार यांनी सर्व कारखान्यांना दिला.

 साखर कारखानदारांची पाठ

 साखर कारखानदार दुसरा हप्ता न देण्याच्या ठाम भुमिकेत दिसले. दत्तचे गणपतराव पाटील, गुरुदत्तचे माधवराव घाटगे हे शिरोळतालुक्यातील अध्यक्ष वगळता इतर कारखानदारांनी बैठकीकडे पाठ फिरवली.

Story img Loader