कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील पावसाचा जोर पाहता नदी, ओढ्यातील पाणी रस्त्यावर पसरू लागले आहे. परिणामी जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. ५ मार्गावरील ६ ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली असल्याचे बुधवारी सांगण्यात आले. पर्याय ठिकाणी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पाणलोट भागात पावसाची संततदार कायम असल्याने धरणातील पाणीसाठा वाढत चालला आहे. धरणातील विसर्ग आणि नदी, ओढ्यात वाढणारे पाणी यामुळे वाहतूक विस्कळीत होत आहे.

हेही वाचा >>> आवक घटल्याने मुंबईत टोमॅटोचे दरशतक

murder in Ichalkaranji murder of minor boy in ichalkaranji
इचलकरंजीत अल्पवयीन मुलाचा खून; चौघेजण ताब्यात
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
kolhapur, Heavy Rainfall, Heavy Rainfall in Kolhapur District, Heavy Rainfall Affected kagal tehsil , heavy Rainfall news, Kolhapur news,
कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले; ओढ्यांना पूर
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान

शाहू नाका – शिंगणापूर, चंदगड- हिडनगाव, चिंचवड खिद्रापूर मार्गावर दोन ठिकाणी, बुडवले – हलकर्णी तसेच नवले – देव कांडगाव आजरा या ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे.दोन राज्य मार्गावर दोन ठिकाणी तर तीन जिल्हा मार्गावर चार ठिकाणी वाहतूक बंद आहे. पर्यायी ठिकाणाहून वाहतूक सुरू आहे. पाणी पातळी वाढत असल्याने एकूण २८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी झाली आहे. अशा पाण्यात मंदिरे, दीपस्तंभ पाण्याखाली गेले आहेत. त्यावरून मुले पाण्याच्या प्रवाहात उड्या  मारत असून हा धोकादायक प्रकार रोख्गण्याची मागणी होत आहे. राजाराम बंधारा येथे बुधवारी सायंकाळी २७ फूट पाणी होते.