कोल्हापूर : विशाळगड अतिक्रमण प्रश्नी मुख्यमंत्री आणि माजी खासदार संभाजी राजे यांचे चर्चा घडवून आणावी अशी सूचना आम्ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना घटनेपूर्वी केली होती. तथापि, राज्य शासन, प्रशासन आणि पोलिसांनी कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची योग्य खबरदारी गांभीर्याने घेतली नसल्याने विशाळगडची घटना घडली. हे जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अपयश आहे, असा आरोप खासदार शाहू छत्रपती यांनी केला आहे.

हेही वाचा >>> आम्ही उद्या विशाळगडला जाणार; कोणीही रोखू नये- सतेज पाटील

Baba Siddiqui murder case, Baba Siddiqui,
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणः …या कारणामुळे हल्लेखोरांनी दुचाकी वापरली नाही
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Maratha reservation high court
मराठा आरक्षणविरोधातील याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण, आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकार आता भूमिका मांडणार
frozen sperm to 60 year old parents (1)
मृत अविवाहित मुलाचे वीर्य पालकांच्या स्वाधीन करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश; नेमके प्रकरण काय?
Dr Neelam Gorhe suggestion regarding against women oppression Pune news
महिला अत्याचाराच्या विरोधात सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज- डाॅ. नीलम गोऱ्हे यांची सूचना
uddhav thackeray criticized mahayuti government
न्यायदेवतेवर विश्वास पण दोन वर्षे न्याय मिळाला नाही! उद्धव ठाकरे यांची खंत
online rummy, High Court, State Govt,
ऑनलाईन रमी हा खेळ संधीचा की कौशल्याचा भाग ? राज्य सरकाला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
Ladki bahin yojana BJP workers meeting Marathwada
‘लाडक्या बहिणीं’चे भाजपकडून तीन हजार मेळावे

विशाळगड संदर्भात पत्रका द्वारे खासदार शाहू छत्रपती यांनी भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, राज्य सरकारने अतिक्रमण काढण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला रविवारी जे आदेश दिले तेच यापूर्वी दिले असते तर ही घटना टळली असती. या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या सर्व संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. संभाजीराजे यांच्या आक्रमक भूमिके नंतर हिंसाचार झाला त्याचा निषेध करतो. नुकसान झालेल्यांना शासनाने  भरपाई द्यावी. उद्या मंगळवारी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करणार आहोत. अतिक्रमणे सरसकट काढण्याची कारवाई करावी, त्याबाबत दुजाभाव केला जाऊ नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.