लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर परिसरात, धरण क्षेत्रात पावसाची उघडझाप सुरू आहे. पश्चिम भागात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत किंचित वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळीत गेल्या दोन दिवसात तीन फुटाने वाढ झाली असून राजाराम, रुई, इचलकरंजी हे बंधारे शनिवारी पाण्याखाली गेले.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Who is Hujur in Shaktipeeth Highway MLA Satej Patils question
शक्तीपीठ महामार्गातील हुजूर कोण; आमदार सतेज पाटील यांचा सवाल
Uddhav tHackeray and narendra modi (1)
राज्याच्या राजकारणात उलथापालथ होणार? उद्धव ठाकरे एनडीएत जाणार असल्याची चर्चा; नेते म्हणतात, “मोये मोये…”
big leaders, Ajit Pawar group,
अजित पवार गटाचे दोन बडे नेते शरद पवार यांच्या भेटीला; कोल्हापुरात खळबळ
maharashtra ministers in modi govt
मोदींच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळांकडे मोठी जबाबदारी? महाराष्ट्रातील सहा मंत्र्यांकडे कोणती खाती?

जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यात जोरदार पाऊस पडला होता. गगनबावडा, शाहूवाडी, चंदगड, भुदरगड तालुक्याला पावसाने झोडपले होते. करवीर, शिरोळ, कागल, हातकणंगले, पन्हाळा तालुक्यात उघडझाप सुरु आहे. यामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

आणखी वाचा-अजित पवार गटाचे दोन बडे नेते शरद पवार यांच्या भेटीला; कोल्हापुरात खळबळ

गेल्या दोन दिवसांपासून स्थिर असलेल्या येथील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अल्पप्रमाणात वाढ होत आहे. राजाराम बंधाऱ्यावर पाणी आले आहे. बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. धोकादायक स्थितीतून वाहने नेऊ नयेत यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पेरण्याबाबत सावधगिरी

गेल्या दोन दिवसांपासून स्थिर असलेल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत इंचाइंचाने वाढ होत आहे. जिल्ह्यात अजूनही पेरण्या ५० टक्के इतक्याच झाल्या आहेत. पावसाचा नेमका अंदाज येत नसल्याने शेतकरी सावध भूमिका घेताना दिसत आहे.