स्पर्धा कोणतीही असो, भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. अशात जर विश्वचषकात, भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असेल तर सामन्याचं तिकीट मिळवण्यासाठी प्रेक्षकांच्या उड्या पडतात. इतर सामन्यांच्या तुलनेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तिकीटाचे दर देखील चढ्या भावाने विकली जातात. अशावेळी प्रत्येक क्रिकेटप्रेमी आपल्या ओळखीमधून भारत विरुद्ध पाक सामन्याचं तिकीट मिळतंय का हे पाहत असतो.

अवश्य वाचा – Ind vs Pak : आमचा विजय निश्चित, विराट कोहलीने व्यक्त केला आत्मविश्वास

या सर्व गोष्टीमधून भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली देखील सुटलेला नाहीये. भारत विरुद्ध पाकिस्तान रविवारी मँचेस्टरच्या मैदानावर समोरासमोर येतील. त्याआधी विराट कोहलीने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विराट कोहलीला सामन्याच्या तिकीटांबद्दल प्रश्न विचारला, यावेळी विराट कोहलीनेही तितकच मजेशीर उत्तर दिलं.

दरम्यान मँचेस्टरच्या मैदानावर रंगणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरही पावसाचं सावट आहे. त्यामुळे या दोन्ही संघांमधला सामना कसा रंगतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – World Cup 2019 : Ind vs Pak टीम इंडियाचा कसून सराव, पाहा हे खास फोटो