विंडीजच्या लेंडल सिमन्सच्या नाबाद अर्धशतकी खेळाच्या जोरावर दुसऱ्या टी २० सामन्यात भारतावर मात केली. विजयासाठी दिलेलं १७१ धावांचं आव्हान विंडीजने २ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत विंडीजच्या फलंदाजांनी तिरुअनंतपुरमच्या मैदानावर फटकेबाजी केली. ८ गडी राखून मिळवलेल्या या विजयासह वेस्ट इंडीजने मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.

Video : रवी शास्त्री भर मैदानात संजू सॅमसनला मारायला गेले आणि…

सामन्यात रोहितला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. पण त्या सामन्यानंतर मुलाखतीत रोहितने एक गोष्ट सांगितल्यामुळे तो चर्चेत आला आहे. कुलदीप यादव, युझवेंद्र चहल आणि रोहित शर्मा हे तिघे मैदानावर धमाल करत होते. रोहित शर्मा त्या दोघांना रॅपिड फायर फेरीचे प्रश्न विचारत होता. त्याचे प्रश्न संपल्यानंतर चहलने रोहितला दाढी काढून टाकण्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर रोहितने झकास उत्तर दिले. तो म्हणाला की माझी दाढी वाढलेली असेल, तर माझी मुलगी समायरा माझ्याशी खेळायला मागत नाही. ती माझ्या जवळ येत नाही. त्यामुळे मी तिच्यासाठी अखेर दाढी काढून टाकली आहे, असे रोहितने सांगितले.

Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Sourav Ganguly Reacts After Sunil Gavaskar Called Dhruv Jurel The Second Rising MS Dhoni
Sourav Ganguly : ‘माही’भाईशी जुरेलची तुलना होताच ‘दादा’ची रोखठोक प्रतिक्रिया; म्हणाला, “धोनीला धोनी बनण्यासाठी…”
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच

वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामन्यात रोहित झटपट बाद झाला. विशेषकरुन रोहित शर्माचं गेल्या काही सामन्यांपासून भारतीय मैदानांवरचं अपयश हे संघासाठी चिंताजनक ठरलं आहे. आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये भारतीय मैदानावर गेल्या ९ सामन्यांमध्ये एका सामन्याचा अपवाद वगळता रोहित शर्मा पूर्णपणे अपयशी ठरला आहे. बांगलादेशविरुद्ध राजकोट येथे झालेल्या सामन्यात केलेली ८५ धावांची खेळी ही त्याची गेल्या ९ सामन्यांमधील सर्वोत्तम खेळी आहे. त्या व्यतिरिक्त ८ सामन्यात त्याला २० धावांचा टप्पाही गाठता आलेला नाही. त्यामुळे आता रोहितच्या फॉर्मवरही साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, सिमन्स आणि एविन लुईस यांनी विंडीजला चांगली सुरुवात करुन दिली. त्यांनी ७३ धावांची भागीदारी केली. सिमन्सने नाबाद ६७ धावा केल्या आणि विंडीजला विजय मिळवून दिला. त्याआधी, भारतीय संघाला १७० धावांवर रोखण्यात विंडीजचे गोलंदाज यशस्वी झाले. शिवम दुबेने सर्वाधिक धावा केल्या. पण रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, जाडेजा हे फारसा प्रभाव पाडू शकले नाहीत.