२४ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयने काल भारतीय संघाची घोषणा केली. २ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने युवा फिरकीपटू मयांक मार्कंडेला भारतीय संघात जागा दिली आहे. कुलदीप यादव आणि युजवेंज्र चहल यांच्यासोबत मयांक मार्कंडेला भारतीय संघात जागा दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या, मात्र मार्कंडेला संघात जागा देण्यासाठी निवड समितीने काही कारणांचा विचार केलेला असू शकतो.

कारण तिसरे – मुंबई इंडियन्स आणि भारत अ संघाकडून मयांकची सर्वोत्तम कामगिरी

राहुल गांधींनी उल्लेख केल्याने बावनकुळेंचा कामठी मतदारसंघ पुन्हा चर्चेत
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका
India Beat England by15 Runs and Wins T20I Series
IND vs ENG: पुण्यनगरीत टीम इंडियाने कमावलं मालिका विजयाचं पुण्य; तिसऱ्या टी२० सामन्यात विजयासह विजयी आघाडी
Maharashtra Breaking News Live Updates in Marathi
Maharashtra Breaking News Updates : नामदेव शास्त्रींकडून धनंजय मुंडेंची पाठराखण, बजरंग सोनवणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कोणाला पाठिंबा…”
Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील
Devotee Angry on yogi adityanath and Narendra modi after stampede in maha kumbha mela
महाकुंभातील भक्त योगी-मोदींवर नाराज का?
We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट

मागच्या हंगामात मयांक मार्कंडने पहिल्या काही सामन्यांमध्ये आपल्या फिरकीने सर्वांना प्रभावित केलं होतं. चेन्नई सुपर किंग्ज आणि सनराईजर्स हैदराबादविरुद्ध त्याने भेदक मारा करत अनेक दिग्गज फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवलं. या कामगिरीमुळे इंग्लंड लायन्स संघाविरुद्ध भारत अ संघाकडून खेळण्याची संधी मयांक मार्कंडेला मिळाली.

इंग्लंड लायन्सविरुद्धच्या सामन्यातही मार्कंडेने ५ बळी घेत आपली उपयुक्तता सिद्ध केली. २०१८-१९ च्या हंगामात मार्कंडे हा पंजाबकडून सर्वात जास्त विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला टी-२० मालिकेत स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे.

कारण दुसरे – कुलदीपला विश्रांती देण्यासाठी मयांकचा पर्याय

आपल्या पदार्पणाच्या काळातच कुलदीप यादवने सर्वांना प्रभावित केलं आहे. अल्पावधीच्या काळातच कुलदीपने रविचंद्रन आश्विन आणि रविंद्र जाडेजा या जोडीची जागा घेतली. अनेक सामन्यांमध्ये कुलदीप यादवने भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. मात्र आगामी विश्वचषक लक्षात घेता कुलदीपला विश्रांती मिळणं गरजेचं आहे. याचसोबत आयपीएलमध्ये कुलदीप कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो. त्यामुळे टी-२० मालिकेत कुलदीपला विश्रांती देऊन मयांक मार्कंडेची फिरकी भारतीय संघ व्यवस्थापन आजमावून पाहु शकतं.

कारण पहिले – २०१९ विश्वचषकासाठी कुलदीप-चहल जोडीला पर्याय

ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिकेत मयांकने संघातली आपली निवड सार्थ ठरवून दाखवल्यास, आगामी २०१९ विश्वचषकासाठी त्याचा कुलदीप-चहल जोडीला पर्याय म्हणून विचार करता येऊ शकतो. कुलदीप आणि चहल यांचं विश्वचषकासाठी भारतीय संघातलं स्थान हे जवळपास निश्चीत मानलं जात आहे, मात्र या दोघांनाही पर्याय म्हणून एका फिरकीपटूला संघात स्थान देण्याचा विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न असेल. रविचंद्रन आश्विन आणि जाडेजा यांना संघात जागा मिळण्याची शक्यता कमी असताना मार्कंडेचा विश्वचषकासाठी विचार केला जाऊ शकतो.

अवश्य वाचा – विश्वचषकासाठी संभाव्य १८ खेळाडूंची यादी तयार – एम.एस.के. प्रसाद

Story img Loader