Aakash Chopra Tweet Viral : ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या ओव्हल मैदानात झालेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यात भारताचा २०९ धावांनी पराभव केला. या विजयासोबत ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या सर्व ट्रॉफी जिंकणारी पहिली टीम बनली आहे. या फायनलच्या पाचव्या दिवशी भारताला विजयासाठी २८० धावांची आवश्यकता होती आणि टीम इंडियाच्या हातात सात विकेट्स होत्या. परंतु, भारतीय फलंदाजांनी लंचच्या आधीच ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर नांगी टाकली. त्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामळे टीम इंडियाची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची प्रतिक्षा आणखी वाढली आहे. भारतीय संघ या सामन्यात मागे कसा राहिला, याबाबत टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि समालोचक आकाश चोप्राने ट्वीटच्या माध्यमातून सांगितलं आहे.

आकाश चोप्राने ट्वीट करत म्हटलं की, “गोलंदाजांसोबत समस्या नाहीय तर फलंदाजीमध्ये समस्या आहे. मागील काही वर्षांपासून गोलंदाजी खराब झालेली नाहीय. ही फक्त फलंदाजी आहे ज्यामुळे भारत मागे पडला आहे. मग कोणताही फॉर्मेट असो.” ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या या सामन्यात टीम इंडियाची टॉप ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप ठरली. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज स्टीव्ह स्मिथ आणि ट्रेविस हेडने ज्याप्रमाणे आक्रमक फलंदाजी केली, टीम इंडियाचे टॉप ऑर्डरचे फलंदाज अशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले. भारताने ७१ धावांवर पहिल्या इनिंगमध्ये ४ विकेट्स गमावले होते. रोहित शर्माने १५ तर गिलने १३, पुजारा १४ आणि कोहलीनेही १४ धावा केल्या होत्या.

Pakistan Former Cricketer Javed Miandad Inzamam Ul aq Slams PCB and Cricket Team for Poor Performance PAK vs BAN
PAK vs BAN: “हा एक वाईट संकेत आहे…” फक्त खेळाडू नाही तर PCB वरही भडकले पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू; जावेद मियांदाद, इंजमाम यांच्या वक्तव्याने वेधले लक्ष
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
unil Gavaskar statement regarding the series in Australia that India is expected to dominate sport news
भारताचेच वर्चस्व अपेक्षित! ऑस्ट्रेलियातील मालिकेबाबत गावस्करांचे भाकीत
MS Dhoni opened up about his bond with Virat
MS Dhoni : ‘वयाचा फरक असला तरी, मी त्याचा…’, विराटबरोबरच्या नात्याबद्दल माही पहिल्यांदाच झाला व्यक्त, VIDEO व्हायरल
jonty rhodes air india flight late over an hour and a half he is wait at mumbai airport
Jonty Rhodes : जॉन्टी ऱ्होड्सने नाराजी व्यक्त केल्यानंतर एअर इंडियाने मागितली माफी, नेमकं काय आहे प्रकण?
Suryakumar Yadav Injury Updates in marathi
Suryakumar Yadav : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्या दुखापतीतून सावरला नाही, तर कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्त्व?
Ramiz Raja on PAK vs BAN Test
PAK vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या पराभवानंतर रमीझ राजा संतापले; म्हणाले, ‘आशिया कपमध्येच भारताने पाकिस्तानची…’
raped on dog up
Animal Cruelty on Dog: विकृत नराधमाचा कुत्र्यावर बलात्कार, व्हायरल व्हिडीओनंतर आरोपीला अटक

नक्की वाचा – WTC फायनलमध्ये सलग दुसऱ्यांदा टीम इंडियाचा पराभव, नेमकं काय चुकलं? पराभवाची ‘ही’ पाच महत्वाची कारणे जाणून घ्या

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगमध्ये ट्रेविस हेड आणि स्टीव्ह स्मिथने शतक ठोकलं. ट्रेविस हेड पहिल्या इनिंगमध्ये शतकी खेळी न करताच पॅव्हेलियनमध्ये परतला असता. परंतु, रहाणेनं त्याचा झेल ड्रॉप केला आणि टीम इंडियासाठी हे खूप महागात पडलं. कारण त्याने १६३ धावांची शतकी खेळी केली आणि पहिल्याच दिवशी टीम इंडियाला बॅकफूटला टाकलं. ट्रेविस हेडने या सामन्यात वेगानं धावा कुटल्या. पहिल्याच इनिंगमध्ये त्याने १७४ चेंडूत १६३ धावा कुटल्या.