Abhinav Mukund criticizes BCCI’s team selection: बीसीसीआयने शुक्रवारी संघाची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली. या दौऱ्यातील कसोटी आणि वनडे मालिकेसाठी संघ जाहीर केला आहे. त्याचबरोबर टी-२० मालिकेसाठी संघाची घोषणा होणे बाकी आहे. अशात आता बीसीसीआयच्या संघ निवडीवर आजी माजी खेळाडून प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता या दौऱ्यासाठी निवडलेला संघ भारतीय खेळाडू अभिनव मुकुंदला आवडला नाही. ट्विट करून त्याने केवळ निवडीवरच प्रश्न उपस्थित केला नाही, तर आयपीएलबद्दलही बरेच काही सांगितले.या दौऱ्यात यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांना कसोटी संघात संधी देण्यात आली आहे. त्याचबरोबर सूर्यकुमार यादव, चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

मुकुंदने तामिळनाडूसाठी १४५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर १०२५८ धावा आहेत. त्याचबरोबर त्याने टीम इंडियासाठी सात कसोटी सामनेही खेळले आहेत. मुकुंदचे मत आहे की, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी ज्या पद्धतीने टीम इंडियाच्या संघाची निवड झाली आहे, ती त्याच्या समजण्यापलीकडची आहे. अशा निवडीमुळे खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याची इच्छा उरणार नाही.

हेही वाचा – Asian Games 2023: बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय; ‘या’ स्पर्धांमुळे एकाचवेळी टीम इंडियाचे दोन संघ उतरणार मैदानात

अभिनव मुकुंद ट्विटमध्ये काय म्हणाला –

अभिनव मुकुंदने ट्विटमध्ये लिहिले की, “मला ही निवड समजू शकली नाही. माझ्या मनात अनेक प्रश्न आहेत, पण सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे देशांतर्गत क्रिकेट खेळून तरुण खेळाडूचा काय उपयोग? टीम इंडियापर्यंत पोहोचण्याचा फ्रँचायझी क्रिकेट हा सोपा मार्ग असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.” या ट्विटला यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांच्यावर निशाणा म्हणून पाहिले जात आहे.

हेही वाचा – IND vs WI: टीम इंडियातून वगळल्यानंतर चेतेश्वर पुजाराचा मोठा निर्णय! आता ‘या’ संघाकडून खेळताना दिसणार

यशस्वी जैस्वालसाठी आयपीएलचा १६वा हंगाम राहिला खास –

यशस्वी जैस्वालने आतापर्यंत केवळ १५ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. तर गायकवाडने २७ सामन्यांमध्ये सहभाग घेतला आहे. हे दोन्ही खेळाडू आयपीएल २०२३ मध्ये खूप यशस्वी ठरले होते. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना यशस्वी जैस्वालनेही शतक झळकावले. त्याचवेळी गायकवाडने चेन्नई सुपर किंग्जसाठी अनेक झंझावाती खेळीही खेळल्या. या खेळाडूंची निवड देशांतर्गत क्रिकेटच्या धर्तीवर नसून आयपीएलच्या धर्तीवर करण्यात आली आहे, असे अभिनव मुकुंदचे मत आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटमध्ये कामगिरी करणाऱ्या खेळाडूंकडे दुर्लक्ष केले जात आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhinav mukund took to twitter and criticized bccis team selection for west indies tour vbm
Show comments