Abu Azmi on Aurangzeb : समाजवादी पार्टीचे नेते व मानखुर्द-शिवाजीनगरचे आमदार अबू आझमी यांनी मुघल शासक औरंगजेबाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ सुरू झाला आहे. आझमी यांच्या वक्तव्यामुळे नवा वाद रंगण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आज त्याचे विधानसभेत पडसाद उमटले. आज (४ मार्च) विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस होता. या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आमदारांनी अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून सभागृहात गोंधळ घातला. परिणामी विधीमंडळाचं आजचं कामकाज तहकूब करण्यात आलं. काल विधिमंडळाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अबू आझमी यांनी ‘औरंगजेब हा क्रूर प्रशासक नव्हता’ असं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली होती. आज भाजपा व शिवसेना (शिंदे) आमदारांनी विधानसभेत या वक्तव्यावरून गोंधळ घातला. अबू आझमी यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा