ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील काही निर्णय भारताच्या विरोधात गेले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) पंच पुनर्आढावा प्रक्रिया (डीआरएस) या तांत्रिक पद्धतीच्या विरोधात आहे. त्यामुळे दोन कसोटी सामन्यांतील पराभवांनंतर डीआरएसची चर्चा पुन्हा ऐरणीवर आहे. या पाश्र्वभूमीवर डीआरएसचा आहे त्या स्थितीत स्वीकार करावा, अन्यथा त्याचे परिणाम भोगा, असा इशारा भारताच्या आजी-माजी क्रिकेटपटूंकडून देण्यात आला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताने पत्करलेल्या दोन कसोटी सामन्यांतील दारुण पराभवांतील पंचांच्या किमान पाच निर्णयांचा पुनर्आढावा घेता आला असता. परंतु भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीलाही डीआरएसवर अद्याप विश्वास निर्माण झालेला नाही.
‘‘आता भारताने डीआरएस स्वीकारण्याची वेळ आली आहे. दोन्ही कसोटी सामन्यांत भारताने चांगली लढत दिली. परंतु निर्णायक क्षणी चुकीचे निर्णय दिले गेले,’’ असे अनुभवी ऑफ-स्पिनर हरभजन सिंगने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा