Gautam Gambhir Says Shreyas Iyer can be a game changer for India in the final: आयसीसी एकदिवसीय विश्वचषका २०२३चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या संपूर्ण विश्वचषकात भारताने चमकदार कामगिरी केली आहे आणि १० पैकी १० सामने जिंकून अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियन संघाने विश्वचषकात खराब सुरुवात केली होती, परंतु उपांत्य फेरीच्या सामन्यापर्यंत त्यांनी आपला जुना फॉर्म दाखवण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चुरशीचा अंतिम सामना अपेक्षित आहे. या सामन्यापूर्वी भारताचा माजी क्रिकेटपटूने एक मोठं वक्तव्य केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत अपराजित राहून अंतिम फेरी गाठली आणि आता तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. भारताला वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी पाचवेळा चॅम्पियन असलेल्या ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा लागेल. या विजयात रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, शुबमन गिल, मोहम्मद यांच्यासह इतर फलंदाज आणि गोलंदाजांचे मोठे योगदान होते. मात्र, आता गौतम गंभीरने श्रेयस अय्यर खरा गेम चेंजर असल्याचे म्हटले आहे.

श्रेयस अय्यर गेम चेंजर ठरू शकतो –

भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने वर्ल्ड कप फायनलपूर्वी स्टार स्पोर्ट्स शोमध्ये आपले मत व्यक्त करताना श्रेयस अय्यरला गेम चेंजर म्हटले आहे. तो म्हणाला, “विराट कोहलीने विश्वचषका चांगली फलंदाजी केली आहे, पण माझ्यासाठी खरा गेम चेंजर श्रेयस अय्यर आहे. पहिला विश्वचषक खेळणाऱ्या या खेळाडूने शानदार फलंदाजी करताना सलग दोन शतके झळकावली आहेत. त्यामुळे अंतिम फेरीतही तो खरा गेम चेंजर ठरू शकतो.”

हेही वाचा – VIDEO: विराटच्या ५० शतकांच्या विक्रमावर कामरान अकमलचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “बाबर आझम मोडू शकतो, कारण तो…”

गौतम गंभीर पुढे म्हणाला, “श्रेयस अय्यरला या विश्वचषकाच्या सुरुवातीला दुखापत झाली होती, त्याला त्याच्या जागेसाठी झगडावे लागले. त्यानंतर बाद फेरीत ७० चेंडूत शतक झळकावणं हे अप्रतिम आहे. जेव्हा मॅक्सवेल आणि झाम्पा अंतिम फेरीत गोलंदाजी करायला येतली, तेव्हा तो भारतासाठी महत्त्वाचा ठरेल.”

हेही वाचा – IND vs AUS Final: “टीम इंडियाला प्रेक्षकांचा मोठा पाठिंबा मिळेल, पण…”, अंतिम सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाच्या कर्णधाराचं मोठं वक्तव्य

श्रेयस अय्यरने आतापर्यंत विश्वचषकात ५२६ धावा केल्या आहेत –

विशेष म्हणजे, विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्य बॅटमधून धावा आल्या नव्हत्या. तो शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला होता.पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले. यानंतर पुढील तीन सामन्यांत तो फ्लॉप ठरला. पण श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात या २९ वर्षीय खेळाडूने आपला फॉर्म दाखवला. त्यानंतर सातत्याने धावा करत आहे. श्रेयस अय्यरने गेल्या दोन सामन्यांमध्ये सलग शतके झळकावली. या विश्वचषकात त्याने आतापर्यंत एकूण ५२६ धावा केल्या आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: According to gautam gambhir shreyas iyer can be a game changer for india in the final match against australia vbm
Show comments