Team India cannot win the World Cup without Jasprit Bumrah: भारताला या महिन्यात आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. जसप्रीत बुमराह १० महिन्यांनंतर टीम इंडियात पुनरागमन करत आहे. परतीच्या मालिकेतच बुमराहला कर्णधार बनवण्यात आले आहे. त्याच्या कामगिरीवर सर्व चाहत्यांची नजर असेल. बुमराहचा अनुभव संघासाठी मोलाचा ठरेल, असा विश्वास भारताचा माजी स्टार फलंदाज मोहम्मद कैफने व्यक्त केला.

मोहम्मद कैफ म्हणाला, नॉकआऊट सामन्यांमध्ये टीम इंडियासाठी बुमराह खूप महत्त्वाचा असणार आहे. जर तो खेळला नाही, तर आशिया कप २०२२ आणि टी-२० वर्ल्ड कप २०२२ मध्ये टीम इंडियाचे जे झाले तेच होईल. आशिया चषक स्पर्धेतील सुपर-फोर फेरीत भारताचा पराभव झाला होता, तर टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडने १० विकेट्सने पराभव केला होता. तो म्हणाला की, भारताकडे दोन किंवा तीन संघ उतरवण्याची क्षमता आहे, पण गोलंदाजीत तितकी खोली नाही.

IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Hardik Pandya Shivam Dube Partnership Record with Fifty for 6th Wicket IND vs ENG 4th T20I
IND vs ENG: हार्दिकचा नो-लूक षटकार तर शिवम दुबेचं दणक्यात पुनरागमन; दुबे-पंड्याने अर्धशतकांसह भारतासाठी रचली विक्रमी भागीदारी
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
Ranji Trophy Cricket Tournament Mumbai vs Meghalaya match sports news
रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा: मुंबईला विजय अनिवार्य,आजपासून मेघालयाशी गाठ; बडोदा विरुद्ध जम्मूकाश्मीर लढतीवरही लक्ष
IND vs ENG Michael Vaughan slams Suryakumar Yadav for poor outing against England in T20I series
IND vs ENG : ‘तुम्ही प्रत्येक चेंडूवर बाऊंड्री मारु शकत नाही…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा सूर्यकुमार यादवला सल्ला
Jasprit Bumrah Wins ICC Mens Test Cricketer of The Year 2024 With Historic Performance
Jasprit Bumrah: ‘गेमचेंजर’ जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी, ICC चा ‘हा’ पुरस्कार जिंकणारा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा

कैफ म्हणाला, सध्या जे खेळाडू जखमी आहेत, ते विश्वचषकात भारतासाठी खूप महत्त्वाचे असतील. त्यांच्या पुनरागमनावर टीम इंडियाच्या आशा टिकून आहेत. बुमराहचे प्रदीर्घ कालावधीनंतर संघात पुनरागमन झाले असून तो खेळल्यानंतरच तो किती तंदुरुस्त आहे हे कळेल. मायदेशात विश्वचषकात चांगली कामगिरी करण्यासाठी भारताला पूर्णपणे तंदुरुस्त बुमराहची गरज आहे. गोलंदाजी विभागात तुमच्याकडे दोन संघ असू शकत नाहीत. जर बुमराहने वर्ल्ड कप खेळला नाही, तर टीम इंडिया या स्पर्धेतून बाहेर पडेल. आशिया चषक टी-२० २०२२ आणि टी-२० विश्वचषक २०२२ प्रमाणेच संघाचे भवितव्य असेल. कारण आपल्याकडे बुमराहसाठी बॅकअप नाही.

हेही वाचा – Sunil Dev : टी-२० विश्वचषक विजेत्या टीम इंडियाच्या व्यवस्थापकाचे निधन, वयाच्या ७५व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

४२ वर्षीय कैफ म्हणाला की, सध्या आमचा संघ मजबूत दिसत नाही. तो म्हणाला, टीम इंडिया सध्या कमकुवत दिसत आहे. कारण केएल राहुल, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यरसारखे अनेक महत्त्वाचे खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. कैफने वेस्ट इंडिजमधील एकदिवसीय मालिकेदरम्यान भारतीय संघ व्यवस्थापनाच्या प्रयोगांबद्दलही सांगितले. संघ व्यवस्थापनाने नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेसाठी विश्रांती दिली होती.

कैफ पुढे म्हणाला, वेस्ट इंडिजमध्ये त्यांनी काय केले यावरूम मी संघाला जज करणार नाही. होय, मला असे म्हणायचे आहे की, जर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला ब्रेक हवा होता, तर त्यांना संघात स्थान मिळायला नको होते. आशिया चषकानंतर मी या संघाला जज करेन आणि त्या १५ खेळाडूंचेही विश्लेषण करेन. आशिया चषकानंतर, या संघाला माहित असले पाहिजे की त्यांचे प्लेइंग-११ कोणती आहे आणि त्यांचे बॅकअप कोण आहेत. विश्वचषकात इशान किशनचा राखीव यष्टीरक्षक म्हणून समावेश करण्याचा सल्लाही कैफने दिला.

हेही वाचा – Manoj Tiwary Retirement: टीम इंडियाच्या फलंदाजाने विश्वचषकापूर्वी घेतली निवृत्ती, सोशल मीडियावर शेअर केली भावनिक पोस्ट

मोहम्मद कैफ म्हणाला, इशानने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. मला अजूनही खात्री नाही की इशान, सूर्यकुमार, संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यर १५ मध्ये एकत्र असतील की नाही. राहुल जर विश्वचषक खेळला, तर त्याचा बॅकअप यष्टिरक्षक कोण असेल हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. इशानला बॅकअप म्हणून ठेवावे. टीम इंडिया उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरेल, असे कैफला वाटते. तो म्हणाला, भारतीय संघासाठी विश्वचषक उपांत्य फेरीपासून सुरू होईल. वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्यासाठी टीम इंडियाला दोन मोठे आणि महत्त्वाचे सामने जिंकावे लागतील.

Story img Loader