Hardik Pandya praises Gill-Jaiswal and bowlers : वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने ९ गडी राखून विजय मिळवला. १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. जैस्वालने ५१ चेंडूंत ११ चौकार आणि ३ षटकार मारून नाबाद ८४ धावा केल्या, तर गिलने ४७ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ७७ धावा केल्या. तिलक वर्माने ७ धावांचे योगदान दिले. या दणदणीत विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने संघाच्या जुन्या चुकांबद्दल सांगितले.

आमच्या गोलंदाजांना मदत करावी लागेल –

सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, “येथे भारतीयांची संख्या जास्त आहे. ते ज्या प्रकारे समर्थन करत आहेत, ते मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे मनोरंजन करणे हे कर्तव्य आहे. गिल आणि जैस्वालच्या कौशल्याबद्दल शंका नाही. पुढे जाऊन, आम्हाला फलंदाजी गट म्हणून जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि आमच्या गोलंदाजांना मदत करावी लागेल. गोलंदाज सामने जिंकतात. जर त्यांनी तुम्हाला काही विकेट्स मिळवून दिल्या तर तुम्ही खेळावर नियंत्रण ठेवू शकता.”

shah rukh khan
शाहरुख खानने आर्यन व सुहानासाठी चाहत्यांना केली ‘ही’ विनंती; म्हणाला, “त्यांना ५० टक्के प्रेम…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Yuvraj Singh Message to Abhishek Sharma After Historic Century Reveals His Father
Yuvraj Singh Abhishek Sharma: “हे विसरू नकोस की तुला…” अभिषेक शर्माला शतकानंतरही युवराज सिंगने दिल्या सूचना, अभिषेकच्या वडिलांनी सांगितलं काय होता मेसेज
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
Abhishek Sharma Credits Suryakumar Yadav Hardik Pandya Axar Patel For his Fastest Century
IND vs ENG: “तिघांनीही मैदानावर आल्यावर मला…”, अभिषेक शर्माने भारताच्या ‘या’ तीन खेळाडूंना दिलं शतकाचं श्रेय; सामन्यादरम्यान काय घडलं?
IND vs ENG Abhishek Sharma break Rohit Sharma record Most sixes for India in a T20I
IND vs ENG : अभिषेक शर्माने मोडला हिटमॅनचा खास विक्रम! टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा पहिलाच भारतीय
Hardik Pandya Throws Bat Curses Himself After His Wicket in IND vs ENG 3rd T20I Video Viral
IND vs ENG: हार्दिक पंड्याने आऊट झाल्यावर मैदानातच काढला राग, बॅट फेकली अन्… VIDEO व्हायरल
Hardik Pandya surpasses Bhuvneshwar Kumar to become Most balls bowled for India in T20I cricket
IND vs ENG : हार्दिक पंड्याची ऐतिहासिक कामगिरी! भुवनेश्वर कुमारला मागे टाकत केला मोठा पराक्रम

मी खेळाच्या हिशोबाने नेतृत्त्व करण्याचा प्रयत्न करतोय –

हार्दिक पांड्याने सलामीवीर शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वालचे कौतुक केले. तो म्हणाला, “शुबमन आणि यशस्वीची कामगिरी शानदार होती. या उन्हात ते ज्या प्रकारे धावले आणि त्यांनी काम पूर्ण केले. हे पाहणे सुखद होते. मी खेळाच्या हिशोबाने नेतृत्त्व करण्याचा प्रयत्न करतोय. मला माझ्या प्रवृत्तीनुसार पुढे जायला आवडते.”

हेही वाचा – IND vs WI 4th T20: यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलचा मोठा धमाका! रोहित-शिखरचा मोडला ‘हा’ विक्रम

हार्दिक पांड्याने मान्य केली आपली चूक –

पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय कर्णधाराने ही आमची चूक असल्याचे सांगितले. हार्दिक म्हणाला, “आम्ही दोन सामने हरलो पण पहिल्या सामन्यात आमचीच चूक होती. आम्ही खूप चांगले खेळत होतो, आम्ही शेवटच्या चार षटकांमध्ये चुका केल्या आणि आमच्या चुकांमुळे आम्हाला यश मिळू शकलं नाही. पुढच्या दोन सामन्यांमध्ये आम्ही फारशी वेगळी कामगिरी केली नाही. या सर्व सामन्यांमुळे आमचा आत्मविश्वास खूप वाढला आहे.”

हेही वाचा – असामान्य क्रिकेटपटूमधील ‘साध्या माणसा’शी संवाद; बुधवारी ‘लोकसत्ता गप्पा’मध्ये अजिंक्य रहाणे

आम्हाला कंबर कसावी लागली –

भारतीय कर्णधार पुढे म्हणाला, “आम्हाला कंबर कसावी लागली आणि चांगले क्रिकेट खेळावे लागले, युवा खेळाडूंनीही तेच केले. टी-२० क्रिकेटमध्ये कोणीही कोणाचे आवडते नसते. तुम्हाला मैदानात उतरून चांगले क्रिकेट खेळायचे असते. तुम्हाला समोरच्या संघाचा आदर करावा लागेल. आमच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळल्यामुळे ते २-० ने पुढे होते. उद्या आम्ही येऊ आणि आज जे केले ते करू आणि चांगल्याची आशा करू.”

Story img Loader