Hardik Pandya praises Gill-Jaiswal and bowlers : वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने ९ गडी राखून विजय मिळवला. १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. जैस्वालने ५१ चेंडूंत ११ चौकार आणि ३ षटकार मारून नाबाद ८४ धावा केल्या, तर गिलने ४७ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ७७ धावा केल्या. तिलक वर्माने ७ धावांचे योगदान दिले. या दणदणीत विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने संघाच्या जुन्या चुकांबद्दल सांगितले.

आमच्या गोलंदाजांना मदत करावी लागेल –

सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला, “येथे भारतीयांची संख्या जास्त आहे. ते ज्या प्रकारे समर्थन करत आहेत, ते मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे मनोरंजन करणे हे कर्तव्य आहे. गिल आणि जैस्वालच्या कौशल्याबद्दल शंका नाही. पुढे जाऊन, आम्हाला फलंदाजी गट म्हणून जबाबदारी स्वीकारावी लागेल आणि आमच्या गोलंदाजांना मदत करावी लागेल. गोलंदाज सामने जिंकतात. जर त्यांनी तुम्हाला काही विकेट्स मिळवून दिल्या तर तुम्ही खेळावर नियंत्रण ठेवू शकता.”

Ranji Trophy Cricket All rounder Shardul Thakur reacts ahead of match against Baroda vs Maharashtra sports news
बडोद्याविरुद्धच्या पराभवातून धडा, आता विजयी पुनरागमनाचे ध्येय!महाराष्ट्रविरुद्धच्या सामन्यापूर्वी अष्टपैलू शार्दूल ठाकूरची प्रतिक्रिया
Challenges before President PT Usha in the Indian Olympic Association struggle sport news
वार्षिक सभेत उषा यांच्या विरोधात अविश्वास ठराव; भारतीय…
Mohammed Siraj Devon Conway Engage In Banter in India vs New Zealand Test
IND vs NZ: “DSP आहे आता तो…”, मोहम्मद सिराज आणि डेव्हॉन कॉन्वे लाईव्ह सामन्यातच भिडले, सुनील गावसकरांच्या वाक्याने वेधलं लक्ष
South Africa Beat Australia Women Team by 8 Wickets and Enters Finals of ICC Womens T20 World Cup 2024
RSAW vs AUSW: बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत दाखल, आफ्रिकन संघाने घेतला मोठा बदला
Rohit Sharma Reveals Virat Kohli Took Responsibility of Batting At No 3 in IND vs NZ Bengaluru Test
IND vs NZ: “विराटला ही जबाबदारी…”, कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला का पाठवलं? रोहित शर्माने केला मोठा खुलासा
Rohit Sharma Statement on Rishabh Pant Injury Gives Massive Update Said He Has Swelling in Knee IND vs NZ
Rishabh Pant: “सर्जरी झालेल्या गुडघ्याला…”, ऋषभ पंतची दुखापत किती गंभीर? रोहित शर्माने दिले मोठे अपडेट
IND vs NZ 1st test updates Rohit Sharma abusing Sarfaraz Khan
IND vs NZ : पहिल्या कसोटी सामन्यात संतापलेल्या रोहितकडून सर्फराझ खानला शिवीगाळ, VIDEO होतोय व्हायरल
Rohit Sharma Statement on India All Out At 46 and Batting First Decision After Winning Toss In Press Conference IND vs NZ
Rohit Sharma: “माझ्यामुळे संघाची ही स्थिती…”, रोहित शर्माचे भारत ४६ वर ऑल आऊट झाल्यानंतर मोठे वक्तव्य, नाणेफेकीच्या निर्णयाबद्दल पाहा काय म्हणाला?
IND vs NZ 1st Test Match Updates in Marathi Mohammad Kaif on Rohit Sharma
IND vs NZ : रोहित शर्माकडून पहिल्या डावात कुठे झाली सर्वात मोठी चूक? मोहम्मद कैफने स्पष्टच सांगितलं

मी खेळाच्या हिशोबाने नेतृत्त्व करण्याचा प्रयत्न करतोय –

हार्दिक पांड्याने सलामीवीर शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वालचे कौतुक केले. तो म्हणाला, “शुबमन आणि यशस्वीची कामगिरी शानदार होती. या उन्हात ते ज्या प्रकारे धावले आणि त्यांनी काम पूर्ण केले. हे पाहणे सुखद होते. मी खेळाच्या हिशोबाने नेतृत्त्व करण्याचा प्रयत्न करतोय. मला माझ्या प्रवृत्तीनुसार पुढे जायला आवडते.”

हेही वाचा – IND vs WI 4th T20: यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिलचा मोठा धमाका! रोहित-शिखरचा मोडला ‘हा’ विक्रम

हार्दिक पांड्याने मान्य केली आपली चूक –

पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारतीय कर्णधाराने ही आमची चूक असल्याचे सांगितले. हार्दिक म्हणाला, “आम्ही दोन सामने हरलो पण पहिल्या सामन्यात आमचीच चूक होती. आम्ही खूप चांगले खेळत होतो, आम्ही शेवटच्या चार षटकांमध्ये चुका केल्या आणि आमच्या चुकांमुळे आम्हाला यश मिळू शकलं नाही. पुढच्या दोन सामन्यांमध्ये आम्ही फारशी वेगळी कामगिरी केली नाही. या सर्व सामन्यांमुळे आमचा आत्मविश्वास खूप वाढला आहे.”

हेही वाचा – असामान्य क्रिकेटपटूमधील ‘साध्या माणसा’शी संवाद; बुधवारी ‘लोकसत्ता गप्पा’मध्ये अजिंक्य रहाणे

आम्हाला कंबर कसावी लागली –

भारतीय कर्णधार पुढे म्हणाला, “आम्हाला कंबर कसावी लागली आणि चांगले क्रिकेट खेळावे लागले, युवा खेळाडूंनीही तेच केले. टी-२० क्रिकेटमध्ये कोणीही कोणाचे आवडते नसते. तुम्हाला मैदानात उतरून चांगले क्रिकेट खेळायचे असते. तुम्हाला समोरच्या संघाचा आदर करावा लागेल. आमच्यापेक्षा चांगले क्रिकेट खेळल्यामुळे ते २-० ने पुढे होते. उद्या आम्ही येऊ आणि आज जे केले ते करू आणि चांगल्याची आशा करू.”