Virat-Sachin 29th Century coincidence: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत विराट कोहलीने २०१९ नंतर कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावले आहे. दोन्ही संघांमधील दुसरा कसोटी सामना त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात यजमान संघ वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचवेळी कोहलीने आता आपल्या शतकाच्या जोरावर क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे.

विशेष म्हणजे विराट कोहली क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये त्याच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी ओळखला जातो. यासोबतच त्याने आपला ५०० वा आंतरराष्ट्रीय सामना संस्मरणीय बनवला आहे. कारण त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटीत आपले ७६ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आहे.आता रन मशिन कोहलीने आपला फॉर्म यापुढेही कायम राखावा आणि अशीच फलंदाजी करत राहावी अशी अपेक्षा प्रत्येकाला असेल.

Trade deficit narrows to five month low in September
व्यापार तूट घटून सप्टेंबरमध्ये पाच महिन्यांच्या नीचांकी
Zeeshan Siddique slams Uddhav Thackeray
झिशान सिद्दिकींच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दिला उमेदवार; खोचक…
Sensex Nifty decline on sales in Reliance print eco news
रिलायन्समधील विक्रीची सेन्सेक्स, निफ्टीला झळ
Loksatta explained Reserve Bank Credit Policy Committee decided to keep the repo rate unchanged
सलग दहाव्यांदा व्याजदर ‘जैसे थे’! रिझर्व्ह बँकेकडून नजीकच्या काळात व्याजदर कपात संभवते का?
Capital gains and taxation on sale of house
घराच्या विक्रीवर झालेला भांडवली नफा आणि कर आकारणी
yazidi woman rescued from gaza
‘ISIS’ने अपहरण केलेल्या याझिदी महिलेची ‘गाझा’मधून तीन देशांनी कशी केली १० वर्षांनंतर सुटका?
Atal Setu Suicide
Atal Setu Suicide : अटल सेतूवरून उडी घेत ५२ वर्षीय व्यावसायिकाची आत्महत्या; तीन दिवसांत दुसरी घटना
sri lanka president leftist leader anura kumara dissanayake
लेख : श्रीलंकेसाठी ‘ग्रीक’ धडे!

विराटच्या ५०० व्या सामन्यात त्याने शतक झळकावले. त्याचे हे २९वे शतक आहे. सचिन तेंडुलकरने झळकावलेल्या २९व्या शतकाबाबत अनोखा योगायोग जुळून आला आहे. सचिन तेंडुलकरने २००२ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये २९ वे कसोटी शतक झळकावले होते. विराट कोहलीने २०२३ मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये २९ वे कसोटी शतक झळकावले.

५५ महिन्यांनी परदेशी भूमीवर ठोकले कसोटी शतक

विराटने ५५ महिन्यांनंतर अर्थात तब्बल १६७७ दिवसांनी परदेशी भूमीवर कसोटीत शतक ठोकले आहे. परदेशी भूमीवर शेवटचे शतक विराटने डिसेंबर २०१८ मध्ये पर्थ स्टेडियमवर झळकावले होते. म्हणजेच तब्बल साडेचार वर्षांनी परदेशी भूमीवर शतक झळकावले. १६ डिसेंबर २०१८ रोजी विराटने पर्थमध्ये शतक झळकावले होते. त्यानंतर त्या सामन्यात त्याने १२३ धावांची खेळी केली. आता त्याने परदेशी भूमीवर ३७ डावांनंतर कसोटी शतक झळकावले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध कोहलीचे हे तिसरे कसोटी शतक ठरले. याआधी त्याने नॉर्थसाऊंड (२००) आणि राजकोट कसोटीत (१३९) शतके झळकावली होती.

हेही वाचा: IND vs PAK: पुन्हा मौका मौका! बांगलादेशवरील विजयाने अंतिम सामन्यात रंगणार भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला

कोहली १२१ धावा करून बाद झाला

सुरेख शतक झळकावल्यानंतर कोहली धावबाद झाला आणि भारताने ५वी विकेट गमावली. त्याने २०६ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने १२१ धावांची खेळी केली. वॅरिकनच्या चेंडूवर स्क्वेअर लेगवर खेळून विराटने जडेजाला एक धाव घेण्यासाठी आवाज दिला. अल्झारी जोसेफने नॉन-स्ट्रायकरच्या एंडला थेट थ्रो केला आणि विराट क्रीजपासून फार दूर राहिला. विराटने रवींद्र जडेजासोबत २८६ चेंडूत १५९ धावांची भागीदारी केली. सध्या भारताने ३९३ धावांवर ७ विकेट्स गमावल्या आहेत. इशान किशन २५ धावांवर बाद झाला असून अश्विन १८ धावांवर खेळपट्टीवर टिकून आहे.