India vs Netherlands, Akshar Patel on Team India: १५ जणांच्या विश्वचषक २०२३ संघात हार्दिक पांड्याच्या जागी नाव नसतानाही, अक्षर पटेलने दाखवून दिले आहे की त्याला त्याच्या संघातील किंवा टीम इंडियातील कोणत्याही सदस्याविषयी राग किंवा कटुता नाही. व्यवस्थापनाप्रती कोणताही चुकीचा विचार तो करत नाही. पटेलची भारतीय संघात निवड न झाल्याने अक्षराने त्याच्या सोशल मीडियावर एक गुप्त संदेश पोस्ट केला होता. गुजरातच्या खेळाडू अक्षर पटेलने टीम इंडियाचे सहकारी आणि मोहम्मद सिराजची भेट घेतली. ज्याचा फोटो व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोहम्मद सिराज आणि टीम इंडिया १२ नोव्हेंबर रोजी नेदरलँड्सविरुद्ध भारताच्या लीग स्टेज सामन्यासाठी बंगळुरूमध्ये आहेत. मेन इन ब्लू आणि सिराज दोघेही उत्तम कामगिरी करत आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सिराजने शानदार गोलंदाजी केल्याने उजव्या हाताचा हा वेगवान गोलंदाज जबरदस्त फॉर्ममध्ये आला आहे. भारत आधीच उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे आणि १५ नोव्हेंबरला ते कोणत्या संघाशी सामना करतील हे जाणून घेण्याची प्रतीक्षा करत आहेत.

निवड न झाल्याने अक्षर पटेल नाराज आहे का?

अक्षर पटेल त्याची निवडी न झाल्यामुळे नाखूश असेल पण त्याला खेद वाटणार नाही. एक गोष्ट फक्त ती म्हणजे, त्याच्या जागी आलेल्या रविचंद्रन अश्विनला आतापर्यंत भारताच्या आठ सामन्यांपैकी फक्त एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आहे. एकदिवसीय विश्वचषक (२०१५ आणि २०१९) च्या मागील दोन आवृत्त्यांमध्ये अष्टपैलू खेळाडू आधीच बाजूला झाला होता आणि दुसर्‍या विश्वचषकात त्याला बाकावर बसावे लागले त्यामुळे तो अधिक निराशाजनक असेल.

टीम इंडिया नेदरलँड्सविरुद्ध जिंकल्यास एक मोठा विक्रम आपल्या नावावर करेल. भारतीय संघाने आत्तापर्यंत आठ सामने जिंकले असून नवव्या विजयासह त्यांचा २० वर्ष जुना विक्रम मोडला जाईल. खरे तर, एकाच विश्वचषकात सर्वाधिक सलग आठ सामने जिंकण्याचा विक्रम सध्या भारताच्या नावावर आहे. २०२३ पूर्वी २००३ मध्ये त्यांनी हे केले होते. मात्र, २००३ मध्ये भारताला नवव्या सामन्यात अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी टीम इंडियाला तो विक्रम मागे टाकण्याची संधी आहे.

हेही वाचा: AUS vs AFG: ग्लेन मॅक्सवेलच्या कामगिरीवर वसीम अक्रमचे मोठे विधान; म्हणाला, “अशी फलंदाजी मी आयुष्यात…”

भारताने २००३च्या विश्वचषक मोहिमेला नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून सुरुवात केली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर टीम इंडियाने सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली चमकदार कामगिरी करत सलग आठ सामने जिंकले. या काळात भारताने ग्रुप स्टेजमध्ये झिम्बाब्वे, नामिबिया, इंग्लंड, पाकिस्तान, केनिया, श्रीलंका आणि न्यूझीलंडचा पराभव केला होता. त्यानंतर उपांत्य फेरीत केनियाचा पुन्हा पराभव केला. मात्र, अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने भारताचा १२५ धावांनी पुन्हा एकदा पराभव केला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshar patel joins team india seen with mohammad siraj and other players avw