ICC World Cup 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वन डे मालिकेतील तिसरा सामना २७ सप्टेंबर रोजी राजकोट येथे होणार आहे. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-०अशी अभेद्य आघाडी घेतली असून तिसरा सामन्यातही विजय मिळवण्याचा भारत प्रयत्न करेल. मात्र, तिसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इंदोरमध्ये शतक झळकावणारा शुबमन गिल तिसरा सामना खेळणार नाही. गिलसोबतच शार्दुल ठाकूरलाही तिसऱ्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली असून दोन्ही खेळाडू आपापल्या घरी गेले आहेत. याशिवाय अक्षर पटेलही वेळेत तंदुरुस्त होऊ शकलेला नाही. त्याच्या अश्विनला संधी दिली जाईल. अशा परिस्थितीत अक्षर विश्वचषक खेळण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

शार्दुल ठाकूर आणि शुबमन गिल विश्वचषकात भारताच्या पहिल्या सराव सामन्यासाठी गुवाहाटी येथे भारतीय संघात सामील होतील. भारतीय संघ व्यवस्थापन विश्वचषकापूर्वी काही खेळाडूंवर वर्कलोड मॅनेजमेंट कमी करण्याच्या योजनेवर काम करत आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव या चार खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. दुसरीकडे, अक्षर पटेलची दुखापत अजूनही बरी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर तो विश्वचषक २०२३ खेळू शकणार नाही, अशी चिन्हे दिसत आहेत.

IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
IND vs ENG Saqib Mahmood Triple Maiden Wicket Over
IND vs ENG: कानामागून आला, भारी पडला! व्हिसा दिरंगाई बाजूला सारत मेहमूदने भारताची उडवली दाणादाण, ३ चेंडूत ३ विकेट
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
IND vs ENG Michael Vaughan slams Suryakumar Yadav for poor outing against England in T20I series
IND vs ENG : ‘तुम्ही प्रत्येक चेंडूवर बाऊंड्री मारु शकत नाही…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा सूर्यकुमार यादवला सल्ला
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल
IND vs ENG Nitish Reddy Ruled out of England Series Rinku Singh Injured
IND vs ENG: भारताला दुसऱ्या टी-२० सामन्यापूर्वी मोठा धक्का, दोन खेळाडू संघाबाहेर; BCCI ने जाहीर केला सुधारित संघ

हेही वाचा: Asian Games 2023 India Gold: गोल्डन बॉईज! नेमबाजांचा सुवर्ण लक्ष्यभेद, चीनचा विश्वविक्रम मोडून शेतकऱ्याच्या पोराने केली ऐतिहासिक कामगिरी

अक्षर पटेलच्या या निर्णयावर टिप्पणी करताना बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर म्हणाले, “सुदैवाने आशिया चषकात भरपूर क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. तसे झाले नसते, तर आम्ही याकडे अन्य मार्गाने पाहिले असते. शारीरिक पेक्षा अधिक मानसिकरित्या खेळाडू कसा आहे, याकडे आम्ही जास्त लक्ष देत आहोत. कधी कधी फिरकी गोलंदाजांना जास्त बरा होण्यास वेळ लागत नाही पण आम्ही लक्ष ठेवून आहोत.  खेळाडूंना मानसिक विश्रांतीची गरज असते. विश्वचषकासारख्या स्पर्धेपूर्वी जी वाईट गोष्ट नाही. आमच्याकडे पर्यायी गोलंदाज आहेत.”

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यासाठी रोहित, विराट, कुलदीप आणि हार्दिक उपलब्ध असतील. बीसीसीआयने रविवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “स्टार गोलंदाज बुमराहला त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून सुट्टी देण्यात आली होती. तो राजकोटमध्ये भारतीय संघातही सामील होणार आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या जागी मुकेश कुमारचा संघात समावेश करण्यात होता.

हेही वाचा: Gold Medal: भारतीय महिला क्रिकेट संघाने एशियन गेम्स मध्ये प्रथमच जिंकले सुवर्णपदक; सामन्यानंतर स्मृती म्हणाली, “राष्ट्रगीतावेळी…”

दरम्यान, आशिया चषक स्पर्धेदरम्यान झालेल्या डाव्या मनगटाच्या दुखापतीतून सावरणारा अक्षर पटेल तंदुरुस्त नसल्याचे आणखी एका अहवालातून समोर आले आहे. तो तिसऱ्या सामन्यातून बाहेर पडला असून सध्या तो एनसीएमध्ये त्याच्या फिटनेसवर काम करत आहे. अक्षराच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत सलग तिसऱ्या सामन्यात भारताकडून खेळण्याच्या अश्विनच्या आशा वाढल्या आहेत, जिथे त्याने प्रभावी कामगिरी केली आहे. अश्विनने मोहालीत एक आणि इंदोरमध्ये तीन विकेट्स घेतल्या आहेत. अक्षरच्या फिटनेसचा विचार करता अश्विन आणि त्याच्यापैकी एकाची निवड करणे निवडकर्त्यांना कठीण जाईल.

Story img Loader