रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी-२० सामना खेळवण्यात आला. या कमी धावसंख्येच्या सामन्यात टीम इंडियाने मोठ्या मुश्किलीने ६ गडी राखून विजय मिळवला. पण सामन्यानंतर लखनऊमधील खेळपट्टी आणि सामन्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. या सामन्यासाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीने दोन्ही संघांचे कर्णधारही हैराण झाले होते. या टी-२० सामन्यात एकही षटकार दिसला नाही हे देखील आश्चर्यकारक होते.

लखनऊमध्ये झालेल्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ ९९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतानेही १०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपले ४ फलंदाज बाद गमावले. अशा प्रकारची खेळपट्टी भारतातील कोणत्याही टी-२० सामन्यात क्वचितच पाहायला मिळते, जिथे फलंदाज प्रत्येक धावांसाठी धडपडताना दिसतात.

IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
IND vs ENG Michael Vaughan slams Suryakumar Yadav for poor outing against England in T20I series
IND vs ENG : ‘तुम्ही प्रत्येक चेंडूवर बाऊंड्री मारु शकत नाही…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा सूर्यकुमार यादवला सल्ला
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
IND vs ENG I dont think the toss went against us says Varun Chakravarthy after England defeat India at at Rajkot
IND vs ENG : नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा टीम इंडियाचा निर्णय महागात पडला का? वरुण चक्रवर्तीने दिले ‘हे’ उत्तर
Jasprit Bumrah Wins ICC Mens Test Cricketer of The Year 2024 With Historic Performance
Jasprit Bumrah: ‘गेमचेंजर’ जसप्रीत बुमराहची ऐतिहासिक कामगिरी, ICC चा ‘हा’ पुरस्कार जिंकणारा भारताचा पहिला वेगवान गोलंदाज
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
Ravi Bishnoi Reveals Inside Chat With Tilak Varma During Match Winning Partnership vs England
IND vs ENG: “तो सेट झाला होता आणि मी घाईघाईत…”, तिलक वर्मा-रवी बिश्नोईमध्ये अखेरच्या षटकांमध्ये नेमकं काय बोलणं झालं?

सामन्यात एकही षटकार मारला गेला नाही –

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील या सामन्यातही एक विक्रम झाला, या सामन्यात २३९ चेंडू टाकले गेले आणि एकही षटकार मारला गेला नाही. कोणत्याही टी-२० सामन्यातील अशा प्रकारची ही पाचवी मोठी घटना ठरली. यादरम्यान सामन्यात १६ फलंदाजांनी फलंदाजी केली, ज्यांनी केवळ १८३ धावा केल्या. संपूर्ण सामन्यात केवळ १४ चौकार मारले गेले.

हेही वाचा – IND vs NZ: भुवनेश्वरला मागे टाकत युझवेंद्र चहलचा नवा विक्रम; टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणार ठरला पहिलाच भारतीय

एकही षटकार न लागवलेले सामने –

गॉर्नसी विरुद्ध जर्सी, १९ फलंदाज, २४३ चेंडू
गॉर्नसी विरुद्ध जर्सी, १६ फलंदाज, २४३ चेंडू
हाँगकाँग विरुद्ध युगांडा, १९ फलंदाज, २४३ चेंडू
केनिया विरुद्ध आयर्लंड, २० फलंदाज, २४० चेंडू
भारत विरुद्ध न्यूझीलंड, १६ फलंदाज, २३९ चेंडू

खेळपट्टीबद्दल प्रश्न उपस्थित –

चाहत्यांबरोबरच कर्णधार हार्दिक पांड्यानेही लखनऊच्या खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सामन्यानंतर हार्दिक पांड्या म्हणाला की, ”खरे सांगायचे तर ती चकित करणारी खेळपट्टी होती. आम्ही दोन्ही सामने खेळलो आहोत, दोन्हीमध्ये असेच होते. कठीण खेळपट्टीवर खेळायला माझी हरकत नाही, मी त्यासाठी तयार आहे. पण या खेळपट्ट्या टी-२० सामन्यांसाठी नव्हत्या.”

हेही वाचा – IND vs NZ 2nd T20: वॉशिंग्टनच्या धावबादवर सामन्यानंतर सूर्याने दिली प्रतिक्रिया; म्हणाला,’मी चेंडू …’

हार्दिक पांड्या पुढे म्हणाला की, ”जिथे सामने होत असतील तिथे खेळपट्टी अगोदरच तयार करावी. जेणेकरून सामन्याच्या दिवसापर्यंत खेळपट्टी तयार करता येईल आणि त्यांना वेळ मिळेल.” केवळ हार्दिक पांड्याच नाही तर इतर अनेक तज्ञ आणि चाहत्यांनीही ही खेळपट्टी टी-२० साठी योग्य नाही असे म्हटले आहे.

Story img Loader