आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची १४० वी बैठक मुंबईत होणार आहे. शनिवारी बीजिंगमध्ये झालेल्या १३९ व्या ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत भारताने पुढील बैठकीचे यजमानपद मिळवले. या काळात कोणत्याही देशाने भारताला विरोध केला नाही. आता २०२३ मध्ये, भारत दुसऱ्यांदा ऑलिम्पिक समितीच्या बैठकीचे यजमानपद भूषवणार आहे, तर ही बैठक प्रथमच मुंबईत होणार आहे.

भारताकडून अभिनव बिंद्रा, नरिंदर बत्रा आणि नीता अंबानी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १३९ व्या बैठकीत सहभागी झाले होते. ऑलिम्पिकमध्ये एकेरी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अभिनव हा भारताचा पहिला खेळाडू आहे. बत्रा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा आहेत, तर नीता अंबानी भारतीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य आहेत. भारताचे क्रीडा आणि युवा मंत्री अनुराग ठाकूरही या बैठकीला उपस्थित होते.

BCCI Award Winners List of 2023 24 Sachin Tendulkar Jasprit Bumrah Ravichandran Ashwin
BCCI Award Winners List: बुमराह, सचिन तेंडुलकर ते मुंबई क्रिकेट असोसिएशन… BCCIच्या मोठ्या पुरस्कारांचे कोण ठरले मानकरी? वाचा संपूर्ण यादी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
India vs England 4th T20I match today in Pune sports news
फलंदाजांकडून कामगिरी उंचावण्याची अपेक्षा; भारत-इंग्लंड चौथा ट्वेन्टी२० सामना आज पुण्यात
Champions Trophy opening ceremony to be held in Lahore sports news
चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचे उद्घाटन तीन दिवस आधीच? सोहळा लाहोरला घेण्याची योजना
All-party meetings in Parliament
अर्थअधिवेशन आजपासून, पहिला टप्पा १३ फेब्रुवारीपर्यंत; अर्थसंकल्पाबाबत उत्सुकता
Mohammed Shami Makes International Comeback After 435 Days Playing in IND vs ENG 3rd T20I
IND vs ENG: अखेरीस प्रतिक्षा संपली! मोहम्मद शमीचं ४३५ दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन
First-ever conference on tribal diseases in Nagpur experts from 17 countries will participate
आदिवासींच्या आजारावर प्रथमच नागपुरात परिषद… १७ देशातील तज्ज्ञ…
united nation International Year of Cooperatives
सहकारातून समृद्धीकडे…

मुख्यमंत्र्यांनी मानले नीता अंबानींचे आभार

या बैठकीत महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीता अंबानी यांचे ट्विट करत आभार मानले आहेत. त्यांनी लिहले की, “२०२३ च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी सेशनचे आयोजन करणे ही मुंबईसाठी केवळ अभिमानाची गोष्ट नाही तर भारताला क्रीडा क्षितिजावर पुढे नेण्याची संधी देखील आहे. २०२३ चे सेशन मुंबई, महाराष्ट्राकडे आणण्याकरता श्रीमती नीता अंबानी यांचे आभार.”

चार दशकांनंतर भारतात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन होणार आहे. शेवटचा कार्यक्रम १९८३ मध्ये झाला होता. सत्रात, आयओसी सदस्य ऑलिम्पिक चार्टर आणि ऑलिम्पिकच्या यजमान शहराची निवड यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतात.

Story img Loader