Asia Cup 2023 Final India vs Sri Lanka : आशिया चषक २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन संघ एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. कोलोंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर हा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा, परंतु, त्याचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराह याने पहिल्याच षटकात सलामीवीर कुसल परेरा याला पव्हेलियनचा रस्ता दाखवत दंड थोपटले. तर पुढच्याच काही षटकांमध्ये मोहम्मद सिराजने श्रीलंकेचा अर्धा संघ तंबूत धाडला.

मोहम्मद सिराज, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह या तीन गोलंदाजांनी अवघ्या १५.२ षटकांत श्रीलंकेचे सर्व फलंदाज बाद केले. श्रीलंकेला केवळ ५० धावा जमवता आल्या. मोहम्मद सिराजने या सामन्यात ७ षटकांत २१ धावा देत ६ बळी घेतले. तर हार्दिक पांड्याने २.२ षटकांत ३ धावा देत ३ बळी घेतले. जसप्रीत बुमराहने एक बळी घेतला.

Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
SL vs AUS Josh Inglis scores century on debut test match in front of parents breaks many records at Galle
SL vs AUS : जोश इग्लिसचे कसोटी पदार्पणात विक्रमी शतक! मोडले अनेक विक्रम
Image Of Bajran Sonawane
Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख यांच्या हत्येला ५० दिवस पूर्ण, बजरंग सोनावणे म्हणाले, “आरोपींना पैसे पुरवणारे…”
IND vs ENG I dont think the toss went against us says Varun Chakravarthy after England defeat India at at Rajkot
IND vs ENG : नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा टीम इंडियाचा निर्णय महागात पडला का? वरुण चक्रवर्तीने दिले ‘हे’ उत्तर
Tilak Varma Scores Most T20I Runs in Between Two Dismissals Broke Mark Chapman Record
IND vs ENG: तिलक वर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये नाबाद राहत केल्या इतक्या धावा; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Ranji Trophy 2025 Shubman Gill scored a century against Karnataka but Punjab lost the match by an innings and 207 runs
Ranji Trophy 2025 : शुबमन गिलची शतकी खेळी व्यर्थ! कर्नाटकाचा पंजाबवर मोठा विजय
Ravindra Jadeja 12 wickets help Saurashtra beat Delhi by 10 wickets in Ranji Trophy 2025 Elite Group match
Ranji Trophy 2025 : जडेजाच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर सौराष्ट्राने पंतच्या दिल्लीचा १० विकेट्सनी उडवला धुव्वा

१५.२ षटकांत श्रीलंकेला सर्व गड्यांच्या बदल्यात केवळ ५० धावांपर्यंत मजल मारता आली. भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी, या वर्षी जानेवारीमध्ये भारताने श्रीलंकेला २२ षटकांत ७३ धावांत गुंडाळलं होतं. इतकंच नव्हे तर भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात कोणत्याही संघाची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी बांगलादेशने २०२४ मध्ये मीरपूरमध्ये भारताविरुद्ध ५८ धावा केल्या होत्या. ५० धावा ही कोणत्याही एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम फेरीतील सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी भारतीय संघ २००० साली शारजाहमध्ये श्रीलंकेविरुद्ध ५४ धावांत ऑल-आऊट झाला होता. भारताचा हा लाजिरवाना विक्रम आज श्रीलंकेने मोडला आहे.

मोहम्मद सिराजने या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीचं दर्शन घडवलं. त्याने तब्बल सहा बळी घेतले. यापैकी चार बळी त्याने एकाच षटकात घेतले. सिराजने सामन्यातील चौथ्या आणि वैयक्तिक दुसऱ्याच षटकात ही कामगिरी केली. एकाच षटकात चार बळी घेण्याचा विक्रम सिराजने नोंदवला. ४९ वर्षांच्या भारताच्या एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या भारतीय गोलंदाजाने एका षटकात चार बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. सिराजने उत्कृष्ट गोलंदाजी केली, ६ बळी घेतले, परंतु, त्याला एक विक्रम मोडता आला नाही.

हे ही वाचा >> IND vs SL : श्रीलंकेविरुद्ध मोहम्मद सिराजचं वादळ, सामना सुरू होताच संपवला, कोणत्याही भारतीयाला जमला नाही असा पराक्रम

एकाच एकदिवसीय सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करण्याचा, सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम मध्यमगती गोलंदाज स्टुअर्ट बिनीच्या नावावर आहे. त्याने २०१४ मध्ये मीरपूर येथे बांगलादेशविरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात ६ षटकांत ४ धावा देत ६ बळी घेण्याचा पराक्रम केला होता. हा विक्रम आधी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळेच्या नावावर होता. अनिल कुंबळेने १९९३ मध्ये कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर वेस्ट इंडिजविरुद्ध खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात ६ षटकांत १२ धावा देत ६ बळी घेतले होते. या यादीत सिराजने तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्याने आजच्या सामन्यात ६ षटकांत २१ धावा देत ६ बळी घेतले आहेत.

Story img Loader