भारताचा आघाडीचा फलंदाज के. एल. राहुलने तब्बल १३१ दिवसांनी भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. दुखापतीमुळे तो चार महिने संघापासून दूर होता. दुखापतीतून सावरल्यानंतर राहुलने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर तो फिटनेस टेस्टही पास झाला. लगोलग त्याची भारतीय संघात निवड झाली. परंतु, राहुलची संघातली निवड अनेकांना रुचली नाही. तसेच आशिया चषक स्पर्धेत सुपर ४ मधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी मधल्या फळीतला भरवशाचा फलंदाज श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्याने राहुलला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. या निर्णयांवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि निवड समितीवर टीकाही झाली. परंतु, त्यावर केएल राहुलने किंवा भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनातील कोणत्याही व्यक्तीने प्रतिक्रिया दिली नाही. राहुलने या सगळ्यांना त्याच्या फलंदाजीने उत्तर दिलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा