इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये दोन दिवसांपूर्वीच भारतासाठी धक्कादायक निकालाची नोंद झाली. भारताच्या पुरुष आणि महिला कबड्डी संघाला इराणकडून पराभवाचा सामना करावा लागला. कबड्डीतलं भारताचं वर्चस्व पाहता दोन हक्काची सुवर्णपदकं ग्राह्य धरुन चालणाऱ्या भारतीय संघाला रौप्य आणि कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. भारताच्या दृष्टीने हा पराभव नक्कीच धक्कादायक आहे, १९९० सालापासून आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डीचा समावेश करण्यात आला. यानंतर आतापर्यंत भारत कबड्डीत आपलं अव्वल स्थान कायम राखत आलेला आहे. मात्र यंदाच्या स्पर्धेत इराणने भारताच्या सोनेरी स्वप्नांना सुरुंग लावला. या पराभवानंतर सोशल मीडिया, क्रीडा रसिकांकडून आश्चर्यवजा नाराजी व्यक्त करण्यात आली. काही जणांनी हॉकीनंतर कबड्डीतही भारत आपलं वर्चस्व गमावणार की काय अशी भीती व्यक्त केली. मात्र भारतासाठी हा पराभव खरंच चिंताजनक आहे का?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा