Asian Games 2023, IND W vs MAL W: भारतीय महिला क्रिकेट संघाचा हांगझाऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. अव्वल मानांकित असल्याने भारताला थेट उपांत्यपूर्व सामना खेळावा लागला. मलेशियाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने १७३ धावा केल्या. पावसामुळे सामना १५ षटकांचा करण्यात आला आणि प्रत्युत्तरात मलेशिया संघाला दोन चेंडूत केवळ एक धाव करता आली. त्यानंतर पाऊस सुरू झाल्याने पुढील खेळ होऊ शकला नाही. यानंतर सामना रद्द करण्यात आला आणि भारताने चांगल्या रँकिंगच्या आधारे उपांत्य फेरी गाठली.

पावसामुळे सामना रद्द झाला

सततच्या पावसामुळे बराच वेळ वाया गेला आणि आता सामना रद्द करण्यात आला आहे. चांगल्या रँकिंगच्या जोरावर टीम इंडियाने उपांत्य फेरी गाठली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत अव्वल मानांकित टीम इंडियाला थेट उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळण्याची संधी मिळाली. मलेशियाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर बंदीमुळे हा सामना खेळू शकली नाही आणि स्मृती मंधानाने संघाची कमान सांभाळली.

Taylor Fritz and Frances Tiafoe of the United States in the men singles semifinals at the US Open sport news
फ्रिट्झची उपांत्य फेरीत धडक, टियाफोचे आव्हान; महिलांमध्ये नवारो-सबालेन्का एकमेकांसमोर
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Bangladesh historic victory over Pakistan, cricket,
विश्लेषण : बांगलादेशने कसा साकारला पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय? भारताला धक्का देण्याची शक्यता किती?
Najmul Shanto on Team India
Najmul Shanto : बांगलादेशच्या कर्णधाराचे ऐतिहासिक विजयानंतर मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘भारताविरुद्ध पण आम्ही…’
unil Gavaskar statement regarding the series in Australia that India is expected to dominate sport news
भारताचेच वर्चस्व अपेक्षित! ऑस्ट्रेलियातील मालिकेबाबत गावस्करांचे भाकीत
Suryakumar Yadav Injury Updates in marathi
Suryakumar Yadav : बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी सूर्या दुखापतीतून सावरला नाही, तर कोण करणार टीम इंडियाचं नेतृत्त्व?
Yashasvi Jaiswal Will be Massive Challenge for All of Us Bowlers Said Australia Nathon Layon
IND vs AUS: रोहित, विराट नाही तर ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लॉयनला भारताच्या ‘या’ तरूण खेळाडूचं टेन्शन, इंग्लंडच्या खेळाडूकडून घेतल्या टिप्स
South Africa beat West Indies by 40 runs
WTC Point Table : दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने पाकिस्तानला धक्का, डब्ल्यूटीसीमध्ये झाला बदल, भारत कितव्या स्थानी?

तत्पूर्वी, उपांत्यपूर्व फेरीतील पहिल्या सामन्यात मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने १७३ धावा केल्या. पावसामुळे सामना १५ षटकांचा करण्यात आला होता. डकवर्थ लुईस नियमानुसार मलेशियासमोर १७७ धावांचे लक्ष्य आहे. भारताची सलामीवीर शफाली वर्माने अफलातून अर्धशतकी खेळी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. तिने ३९ चेंडूत ६७ धावांची खेळी केली, त्यात तिने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. कर्णधार स्मृती मंधांनाने १६ चेंडूत २७ धावा केल्या, त्यात तिने ५ चौकार मारले. दोघांमध्ये ५७ धावांची शानदार अर्धशतकी भागीदारी झाली. त्यानंतर विकेटकीपर जेमिमाह रॉड्रिग्जने २९ चेंडूत ४७ धावांची आक्रमक खेळी केली, त्यात तिने ६ चौकार मारले. तिला रिचा घोषने ७ चेंडूत २१ धावा करत चांगली साथ दिली. मलेशियाकडून सात खेळाडूंनी गोलंदाजी केली, मात्र केवळ इस्माईल आणि इलसा यांना प्रत्येकी एक विकेट घेता आली.

भारतीय संघ हा एशियाडमधील सर्वोच्च मानांकित संघ आहे. सुवर्णपदक जिंकण्यासाठी त्यांना केवळ तीन विजय मिळवावे लागतील. टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली तर हरमनप्रीतला विजेतेपदाचा सामना खेळण्याची संधी मिळेल. येथील तिन्ही सामने भारतासाठी बाद फेरीतील असतील. भारत आणि मलेशिया यांच्यातील सामना पिंगफेंग क्रिकेट फील्ड, झेजियांग युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, हांगझाऊ येथे हा सामना खेळवला गेला.

हेही वाचा: ICC T20 World Cup 2024: टी२० विश्वचषक २०२४साठी ICCने तीन ठिकाणांच्या नावांना दिली मान्यता, कोणते आहेत ते? जाणून घ्या

नऊ वर्षांनी क्रिकेटचा आशियाई क्रीडा स्पर्धेत झाला समावेश

नऊ वर्षांनंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी २०१० आणि २०१४च्या आशियाई खेळांमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता, परंतु भारताने या दोन्ही स्पर्धांमध्ये एकही संघ उतरवला नाही, त्यामुळे २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून क्रिकेटला वगळण्यात आले होते. बीसीसीआयनेही या सामन्यांमध्ये शेवटच्या क्षणी संघ उतरवले आहेत. भारताने महिला आशिया चषक सात वेळा जिंकला आहे तसेच, भारतीय संघ सध्याचा आशियाई चॅम्पियनही आहे. एवढेच नाही तर भारतीय संघाने गेल्या तीन टी२० विश्वचषकांमध्ये उपांत्य फेरीत किंवा त्यापुढेही मजल मारली आहे.

थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला

भारताचा आशिया खंडातील उत्कृष्ट विक्रम लक्षात घेता तो येथे सुवर्णपदकाचा दावेदार मानला जात आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या अव्वल चार संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. मलेशियाने मंगळवारी हाँगकाँगचा २२ धावांनी पराभव केला. त्यामुळे आज ते भारताविरुद्ध सामना खेळत आहेत. भारत आणि मलेशिया याआधीही दोनदा भिडले आहेत, त्यात दोन्ही वेळा भारताने विजय मिळवला आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारताने विजय मिळवला असून उपांत्य फेरीत त्यांचा सामना बांगलादेशशी होऊ शकतो. दुसरीकडे पाकिस्तानचा सामना इंडोनेशियाशी होणार आहे.

हेही वाचा: IND vs AUS 1st ODI: वर्ल्डकपच्या तयारीची भारताला शेवटची संधी, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अश्विनला मिळणार का संधी?

दोन्ही संघ पुढीलप्रमाणे आहेत

भारत: स्मृती मंधांना (कर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), देविका वैद्य, दीप्ती शर्मा, मिन्नू मणी, पूजा वस्त्राकार, राजेश्वरी गायकवाड, कनिका आहुजा, अमनजोत कौर.

मलेशिया: आइना हमिझाह हाशिम, विनिफ्रेड दुराईसिंगम (कर्णधार), मास अलिसा, वान ज्युलिया (विकेटकीपर), माहिरा इज्जती इस्माईल, आयना नजवा, वान नूर जुलैका, नूर अरियाना नटस्या, अस्या अलिसा, नूर दानिया सिउहादा, निक नूर अटिएला.