पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान क्रिकेट संघाला भारतात जाऊन विश्वचषक खेळण्याची परवानगी द्यावी, असे पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने नुकतेच मोठे विधान केले आहे. यासोबतच “पाकिस्तानने भारतात जाऊन विश्वचषक जिंकणे ही बीसीसीआयच्या तोंडावर सर्वात मोठी चपराक असेल”, असेही तो म्हणाले.

राजकीय मुद्द्यांमुळे गेल्या अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये द्विपक्षीय मालिका खेळली जात नाही. हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी आता केवळ बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतात. पण जेव्हापासून पाकिस्तानला आशिया चषक २०२३चे यजमानपद मिळाले आहे, तेव्हापासून यावर गदारोळ सुरू आहे. वास्तविक, राजकीय मुद्दे आणि सुरक्षेच्या कारणांमुळे भारताने आशिया चषकासाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला आहे, त्यानंतर पाकिस्तानकडून २०२३ च्या विश्वचषकासाठी भारतात न येण्याची धमकी दिली जात आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय विश्वचषक भारतात खेळवला जाणार आहे.

chaggan bhujbal
..तर धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या- छगन भुजबळ
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
vishal gawli
कल्याण पूर्वेत बालिका अत्याचार हत्येमधील कुटुंबीयांच्या घरासमोर तरुणांची दहशत; “जामीन झाला नाहीतर एके ४७ बंदूक घेऊन येतो…”
Abhishek Sharma Highest T20I Score for India 135 Runs Breaks Many Records IND vs ENG 5th T20I
IND vs ENG: अभिषेक शर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये कोणत्याच भारतीय फलंदाजाला जमलं नाही ते करून दाखवलं
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
बीड राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या इशाऱ्यानंतर ‘साफसफाई’ होणार का ?
Urvashi Rautela
उर्वशी रौतेलाने ट्रोल करणाऱ्यांना दिलं उत्तर; म्हणाली, “लोक सलमान खान आणि शाहरूख खानला सोडत नाहीत तर…”

क्रिकेट पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार, शाहिद आफ्रिदी म्हणाला, “मला समजत नाही की ते (पीसीबी) इतके ठाम का आहेत आणि आम्ही भारतात जाणार नाही असे का म्हणत आहेत. त्यांनी परिस्थिती सोपी करून एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होत आहे हे समजून घेणे आवश्यक आहे, ते सकारात्मकपणे घ्या, जा आणि खेळा. पाकिस्तानी खेळाडूंना ट्रॉफी घरी आणण्यास सांगा, संपूर्ण देश तुमच्या मागे आहे. हा आमच्यासाठी मोठा विजय तर असेलच पण बीसीसीआयच्या तोंडावरही मोठी चपराक असेल.” ४६ वर्षीय माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू पुढे म्हणाला की, “पीसीबीकडे त्यांच्या प्लेटमध्ये बरेच पर्याय नाहीत, म्हणून त्यांनी जे शक्य आहे आणि त्यांच्या आवाक्यात आहे ते केले पाहिजे.”

पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू आफ्रिदी म्हणाला, “भारतात जा, सभ्य क्रिकेट खेळा आणि विजयाचा दावा करा. हा एकमेव पर्याय आमच्याकडे आहे. आम्हाला तिथे जायचे आहे, विश्वचषक घेऊनच येथे परत येऊ असा स्पष्ट संदेश त्यांना द्यावा लागेल. आम्ही जगण्यासाठी कुठेही जाऊ शकतो, मरणाला घाबरत नाही आणि कधी घाबरणार देखील नाही. भारतीय संघ आणि खास करून बीसीसीआय डरपोक आहे. भारतापेक्षा पाकिस्तान सुरक्षित आहे”, असे विचित्र आणि कुठल्याही तर्काला आधारून नसलेले विधान त्याने केले.

हेही वाचा: Gautam Gambhir: गंभीरला पाहताच कोहली-कोहलीच्या घोषणांनी मैदान दुमदुमले, त्यावर गौतमने अशी काही रिअ‍ॅक्शन दिली की…, Video व्हायरल

आफ्रिदीने नजम सेठींवर काढली भडास

शाहिद आफ्रिदी पाकिस्तानी टीव्हीवरील एका कार्यक्रमात म्हणाला, “नजम सेठी यांनी हे समजून घेतले पाहिजे की पीसीबी अध्यक्षपदाची खुर्ची खूप मोठी आहे आणि त्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. म्हणूनच त्यांनी आपली भूमिका वारंवार बदलू नये. आशिया चषकाबाबत ते वारंवार आपली विधाने बदलत आहे. कधी इकडे कर म्हणतात, कधी तिकडे. आता तो आशिया चषक इंग्लंडमध्ये आयोजित करण्याबाबत बोलले आहे. त्याचे शब्द मला पचनी पडत नाहीत. त्यांना सर्वत्र मुलाखती देण्याची गरज नाही.”

Story img Loader