बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली पुन्हा एकदा वादात सापडला आहे. अलीकडेच कर्णधारपदावरील वक्तव्यावरून गांगुली आणि विराट कोहली यांच्यात वाद झाल्याचे समोर आले होते. मिळालेल्या माहितीनुसार, गांगुली निवड समितीच्या बैठकींमध्ये सहभागी झाला होता. बोर्डाच्या घटनेनुसार गांगुलीला असे करता येत नाही. सोशल मीडियावरही चाहते गांगुलीला ट्रोल करत आहेत. अद्याप बीसीसीआयकडून याबाबत कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही. बोर्ड सध्या आयपीएलच्या मेगा लिलावाची तयारी करत आहे.

इनसाइड स्पोर्ट्सशी बोलताना बोर्डाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ”ही पूर्णपणे फसवी आणि खोटी बातमी आहे.” दुसरा अधिकारी म्हणाला, ”गांगुलीने अनेक प्रसंगी हे केले आहे. आजकाल बीसीसीआयमध्ये असेच चालू आहे. गांगुलीने निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे कोणतेही औचित्य नाही. हे खूप दुर्दैवी आहे.”

PM Narendra Modi Speech
Narendra Modi : ४० मिनिटांच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना कसं लक्ष्य केलं?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
Ashneer Grover Viral Video
Viral Video : “नाम नहीं जानता, तो बुलाया क्यों…”, ‘शार्क टँक’ फेम अशनीर ग्रोव्हरचे सलमान खानला प्रत्युत्तर; येथे पाहा Video
Draupadi murmu and sonia gandhi
Rashtrapati Bhavan : “राष्ट्रपती थकलेल्या नाहीत”, सोनिया गांधींच्या टीकेनंतर राष्ट्रपती भवनातून प्रत्युत्तर!
Chhagan Bhujbal
“तेलगी प्रकरणात माझं…”, दोन दशकानंतर भुजबळांनी मनातली खदखद व्यक्त केली; मंत्रिपदाच्या राजीनाम्याबद्दल म्हणाले…
Rahul Gandhi
Rahul Gandhi : “तुम्ही डुबकी कधी घेणार?”, यमुना प्रदूषणाच्या मुद्द्यावर राहुल गांधींचे केजरीवालांना खुले आव्हान
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”

याआधी एक अधिकारी निवड समितीच्या बैठकीला कोणतेही नियम न जुमानता उपस्थित राहत असल्याचे समोर आले होते. त्याच्यापुढे प्रशिक्षक आणि कर्णधार दोघेही असहाय्य होते. ते काहीच करू शकत नव्हते. बोर्डाच्या नियमानुसार बीसीसीआयचे सचिव बैठकीला उपस्थित राहू शकतात. पण संघ निवडीची संपूर्ण जबाबदारी निवड समिती अध्यक्षावर असते.

हेही वाचा – IND vs AUS U19 WC SEMIFINAL : भारताची पहिली बॅटिंग; ‘असे’ आहेत दोन्ही संघ!

गेल्या वर्षाच्या अखेरीस टीम इंडिया टी-२० वर्ल्डकपच्या पहिल्या फेरीतून बाहेर पडली होती. अलीकडेच दक्षिण आफ्रिकेतही भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. सहा महिन्यांपूर्वीपर्यंत संघाचा नेता मानला विराट कोहली आता कोणत्याही फॉरमॅटमध्ये संघाचा कर्णधार नाही. आता संघ निवडीत निवड समिती अध्यक्ष, कर्णधार आणि प्रशिक्षक यांची भूमिका नगण्य असल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली संघ निवडीत हस्तक्षेप करत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. गांगुली निवड बैठकांना जातो आणि हे पूर्णपणे बीसीसीआयच्या घटनेच्या विरोधात आहे.

Story img Loader