भारतात क्रिकेटचे पीक बारमाही बहरत असते, पण भारतात क्रिकेट चालवणारे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) क्रिकेटमध्येच दुजाभाव करताना दिसते. एकीकडे बीसीसीआयच्या अर्थकारणात मोलाची भर घालणाऱ्या आयपीएलला डोक्यावर घेतले जाते, तर दुसरीकडे देशांतर्गत सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० स्पर्धा सुरू असल्याचा क्रिकेटरसिकांना ठावठिकाणाही लागू दिला जात नाही. कारण बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धापेक्षा नेहमीच आयपीएलला अतिमहत्त्व दिलेले आहे. पण बीसीसीआयने ही आपली अप्पलपोटी भूमिका बदलली तर देशांतर्गत स्पर्धेलाही सुगीचे दिवस येतील आणि प्रेक्षक मोठय़ा संख्येने याकडे वळतील, याचा फायदा स्थानिक खेळाडूंनाही होईल.
बीसीसीआयने फक्त औपचारिकता म्हणून मुश्ताक अली स्पर्धेकडे न पाहता आपला दृष्टिकोन बदलला तर नक्कीच देशांतर्गत ट्वेन्टी-२० स्पर्धाही मोठे व्यासपीठ ठरू शकते, असे मत ‘चर्चेच्या मैदानातून’ या व्यासपीठावर मान्यवरांनी मांडले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा