IND vs WI, World Cup 2023: २०११च्या विजेत्या संघाने केलेल्या तयारीच्या तुलनेत २०२३च्या पुरुषांच्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीमध्ये मोठा फरक असल्याचे मत भारताचे माजी सलामीवीर आकाश चोप्रा याने व्यक्त केले. २००७ एकदिवसीय विश्वचषक संपल्यानंतर आणि २०११ आवृत्ती सुरू होण्यापूर्वी, भारताने ११८ एकदिवसीय सामने खेळले होते. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकाला सुरुवात होण्यासाठी अवघे दोन महिने बाकी असताना, २०१९च्या आवृत्तीच्या समाप्तीपासून भारताने इंग्लंडमध्ये फक्त ५७ सामने खेळले आहेत. याशिवाय २०२१च्या सुरुवातीपासून भारताने ४२ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये ४४ खेळाडूंना आजमावले गेले आहे. जे अधोरेखित करते की मजबूत टीम कॉम्बिनेशन अद्याप प्राप्त झाले नाही.

२०२३ विश्वचषकापूर्वी या दिग्गज खेळाडूने टीम इंडियावर एक धक्कादायक विधान केले होते

२०११ आणि २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या तयारीमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे, तो म्हणजे टी२० क्रिकेट खेळले जाणारे प्रमाण. मला अजूनही आठवतंय की २००७ मध्ये पहिला टी२० विश्वचषक जिंकल्यानंतरही आम्ही टी२० क्रिकेट खेळण्याच्या मूडमध्ये नव्हतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये संघ खेळला.

Rohit Sharma Statement on India Win and His Century in Cuttack IND vs ENG 2nd ODI
IND vs ENG: “इंग्लंडच्या गोलंदाजांनी माझ्या शरीराच्या दिशेने…”, रोहित शर्माचं शतकाबाबत मोठं वक्तव्य; भारताच्या विजयानंतर काय म्हणाला?
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Sunil Gavaskar slam KL Rahul gets out trying to help Shubman Gill get a century in IND vs ENG 1st ODI
IND vs ENG : “हा सांघिक खेळ आहे आणि तुम्हाला…”, गिलच्या शतकाच्या नादात बाद झालेल्या राहुलवर गावस्कर संतापले
Shreyas Iyer Reveals How He Replaces Virat Kohli on Rohit Sharma Phone Call in India Playing XI
IND vs ENG: “मी रात्री चित्रपट बघत होतो अन् रोहितचा फोन…”, श्रेयस अय्यरने सांगितलं कसं झालं टीम इंडियात पुनरागमन, सामन्यानंतर काय म्हणाला?
IND beat ENG by 5 wickets in 1st odi
IND vs ENG: भारताचा इंग्लंडवर सहज विजय, गिल-अय्यर-अक्षरची वादळी खेळी; चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाची जय्यत तयारी
India Playing XI for IND vs ENG 1st ODI Yashasvi Jaiswal Harshit Rana Debut in ODI
IND vs ENG: नागपुरात टीम इंडियाच्या दोन शिलेदारांचं पदार्पण; विराट कोहली संघाबाहेर; कशी आहे भारताची प्लेईंग इलेव्हन?
IND vs ENG Jasprit Bumrah To Miss ODI Series Against England Suspense on Playing Champions Trophy
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध वनडे संघातून जसप्रीत बुमराहचं नाव गायब, BCCIचं मौन; चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार?
IND vs ENG Yuvraj Singh praises Abhishek Sharma innings against England at Wankhede stadium
IND vs ENG : ‘मला तुझ्याकडून हेच…’, अभिषेक शर्माच्या ऐतिहासिक शतकानंतर ‘गुरु’ युवराज सिंगने केले कौतुक

रोहित-कोहली भडकणार!

आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “एकदिवसीय संघ एकत्र इतके क्रिकेट खेळत होते की संघात सर्व काही ठीक चालले होते. हा एक वरिष्ठ संघ होता, वयाच्या दृष्टीने नाही पण अनुभवाच्या अनुषंगाने आवश्यक आहे आणि परंतु त्यांनी भरपूर क्रिकेट खेळले होते. विश्वचषक सुरू होण्यापूर्वी कोणीही ५० पेक्षा कमी एकदिवसीय सामने खेळल्याचे मला आठवत नाही. फलंदाजीत संघ नक्कीच भक्कम होता पण गोलंदाजीतही झहीर खान, हरभजन सिंग आणि आशिष नेहरा सारखे खेळाडू तोपर्यंत भरपूर क्रिकेट खेळले होते.”

टीम कॉम्बिनेशन निश्चित नाही

टीम कॉम्बिनेशनवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला, “आता टीम कॉम्बिनेशन कसं आहे? जर के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर उपलब्ध असतील तर ते अचानक संघात खेळतील आणि ते खूप वेगळे युनिट तयार होईल. पण देव न करो, जर तो तिथे नसेल, तर तुम्ही अशा व्यक्तीकडे पाहत आहात ज्याच्याकडे भारतासाठी २० वन डे खेळायचा अनुभव आहे. तसेच जसप्रीत बुमराह कितपत तंदुरुस्त असेल हे आम्हाला माहीत नाही. त्यामुळे २०११ आणि २०२३च्या तयारीमध्ये हा खूप महत्त्वाचा फरक आहे, कारण विश्वचषक स्पर्धेसाठी फक्त दोन महिने बाकी आहेत आणि तरीही आमचे टीम कॉम्बिनेशन निश्चित झालेले नाही.”

हेही वाचा: Jyothi Yarraji: यश अपयशातील अंतर केवळ ०.०१ सेकंद! विश्वविक्रम रचणाऱ्या ज्योतीचे हुकले पॅरिस ऑलिम्पिकचे तिकीट

पाचव्या क्रमांकावर १४ खेळाडू वापरले

भारताच्या वेस्ट इंडिजवर नुकत्याच झालेल्या २-१ मालिका विजयामुळे के.एल. राहुल, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या अनुपस्थितीत चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर कोण फलंदाजी करेल हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करताना खूप अडचणी आल्या. २०१९ विश्वचषक संपल्यानंतर, भारताने चौथ्या क्रमांकावर ११ आणि पाचव्या क्रमांकावर १४ खेळाडूंचा वापर केला आहे.

सूर्यकुमार यादवने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली

वेस्ट इंडिजविरुद्ध, सहाव्या क्रमांकावर येण्यापूर्वी सूर्यकुमार यादवने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. संजू सॅमसनने चौथ्या क्रमांकावर जाण्यापूर्वी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली, तर अक्षर पटेलने चौथ्या क्रमांकावर एकदा फलंदाजी केली. ४५ वर्षीय चोप्राला वाटते की, “या प्रयोगांवरून असे दिसून येते की जर अय्यर आणि राहुल विश्वचषकासाठी वेळेत तंदुरुस्त नसतील तर भारत या बॅटिंग स्लॉटमध्ये बसू शकतील असे खेळाडू मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. येथे, मला वाटते की इथे रोहितचे हात बांधले गेले आहेत, कारण वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेदरम्यान संघावर बरीच टीका झाली होती.”

हेही वाचा: Ireland Squad vs India: जसप्रीत बुमराहसमोर आयर्लंडचे आव्हान! आयरिश क्रिकेट बोर्डाने केला संघ जाहीर, जाणून घ्या

कोणालाही दोष देऊ शकत नाही- आकाश चोप्रा

“संघाचे तीन सामन्यांत अनुक्रमे ३ आणि ४ क्रमांकावर तीन वेगवेगळे फलंदाज असल्यामुळे हा संघ नेमका काय करत आहे? आणि हे जाणूनबुजून झालेले नाही, असा प्रश्‍न निर्माण होतो. आमच्याकडे जे काही आहे, त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आहे, यावर संघ आता ठाम आहे. फलंदाजी क्रमात बदल केल्याने कोणालाही दोष देऊ शकत नाही. कारण, संघ व्यवस्थापनाकडे पर्याय फार कमी आहेत.”

Story img Loader