Gautam Gambhir statement on Ben Stokes : गौतम गंभीर क्वचितच क्रिकेटच्या मैदानावर हलके-फुलके क्षण शेअर करताना दिसतो. गंभीरचा स्वभावही आडनावाप्रमाणेच गंभीर आहे. भारताच्या माजी सलामीवीराला वास्तविक जीवनातही गंभीर राहणे आवडते. क्रिकेटच्या मैदानावर हलके-फुलके क्षण घालवायचे विसरून जा, त्याच्या चेहऱ्यावर हसूही क्वचितच पाहिला मिळते. मात्र, विश्वचषक विजेता इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सबद्दल बोलताना एक मजेदार विनोद करण्यापासून तो स्वतःला रोखू शकला नाही. ज्यामध्ये त्याने बेन स्टोक्स दिल्लीत कोणत्या कारणामुळे लोकप्रिय आहे, याबद्दल सांगितले.

म्हणून बेन स्टोक्स दिल्लीतील लोकांचा लोकप्रिय खेळाडू –

स्पोर्ट्सकीडाला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, गौतम गंभीरने जगातील अव्वल अष्टपैलू खेळाडूंबद्दल सांगताना आंद्रे रसेल आणि कॅमेरॉन ग्रीन सारख्या खेळाडूंचा उल्लेख केला. मात्र, त्याने यादरम्यान बेन स्कोक्सच्या नावाचा खास उल्लेख केला. यानंतर शोच्या होस्टने गौतम गंभीरला विनोदाने दिल्लीतील स्टोक्सच्या लोकप्रियतेबद्दल विचारले. प्रत्युत्तरात, माजी क्रिकेटपटू आनंदाने म्हणाला की, “बेन स्टोक्स हा दिल्लीतील लोकांचा चुकीच्या कारणांमुळे आवडता खेळाडू आहे. तो आणखी एका कारणासाठी त्यांचा आवडता खेळाडू असावा. कारण तो दर्जेदार खेळाडू आहे. त्याच्याकडे अविश्वसनीय गुणवत्ता आहे.”

mrunmayi deshpande shares special post for sister gautami deshpande
“गौतु नंबर १ अन् बाकी सगळे…”, मृण्मयी देशपांडेची लाडक्या बहिणीच्या वाढदिवशी खास पोस्ट, गौतमी कमेंट करत म्हणाली…
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
dr Madhav Gadgil
Madhav Gadgil : ज्ञानातील विषमता दूर करण्याचे सामाजिक कार्यकर्त्यांपुढे आव्हान, डॉ. माधव गाडगीळ यांचे मत
Jos Buttler Creates History in T20I Scored Most Runs in India by Visiting Batter 556 Runs IND vs ENG
IND vs ENG: जोस बटलरची ऐतिहासिक कामगिरी, भारतात टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
Rohit Sharma complains to BCCI about Sunil Gavaskar after blames his criticism BGT in Australia
Rohit Sharma : रोहित शर्माने बीसीसीआयकडे केली सुनील गावस्करांची तक्रार? नेमकं काय आहे कारण? जाणून घ्या
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
Land prices increase as celebrities are attracted to Alibaug for investment
तारांकितांना गुंतवणुकीसाठी अलिबागची भुरळ, जमिनींचे भाव गगनाला
Gautam Gambhir Manoj Tiwary Controversy : Gautam says Sourav Ganguly apna jack laga ke aaya Manoj Tiwary has revealed
Manoj Tiwary : ‘तो जॅक लावून आला आणि तू पण…’, गंभीरने गांगुलीबद्दल केलं होतं वादग्रस्त वक्तव्य; मनोज तिवारीचा खुलासा

बेन स्टोक्सच्या नावाचा उच्चार हा हिंदीतील अतिशय लोकप्रिय अपशब्दासारखा आहे. कारण भूतकाळात काही विनोदी घटना घडल्या आहेत. अनेकवेळा विराट कोहली मैदानावर असेच अपशब्द वापरताना दिसला आहे. खरे तर खुद्द स्टोक्सने नुकतीच खिल्ली उडवली होती. २०१९ मध्ये, स्टोक्सने ट्विटरवर असे सांगितले होते की, कोहलीने प्रत्येक वेळी त्याच्या नावाचा उल्लेख केलेल्या ट्विटद्वारे त्याला सतत लक्ष्य केले जात असल्यामुळे तो कदाचित त्याचे ट्विटर खाते डिलीट करु शकतो. स्टोक्सने लिहिले होते की, “मी ट्विटर हटवू शकतो. त्यामुळे मला दुसरे ट्विट कधीच पाहावे लागणार नाही.” पुढे बोलताना गौतम गंभीरने त्याच्या क्रीडा कारकीर्दीबद्दल आणि गोलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात करूनही त्याने अष्टपैलू बनण्याचा निर्णय का घेतला नाही? याबद्दलही खुलासा केला.

हेही वाचा – RR vs PBKS : २२ वर्षीय रियान परागचा मोठा पराक्रम! मिचेल मार्श आणि सूर्यकुमार यादवच्या खास क्लबमध्ये झाला सामील

अष्टपैलू खेळाडूबद्दल गौतम गंभीरची प्रतिक्रिया –

भारताच्या सर्वोत्कृष्ट सलामीच्या फलंदाजांपैकी एक असलेल्या गंभीरने सांगितले की, “मी कधीच अष्टपैलू बनण्याचा विचार केला नाही. खरं तर मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात एक गोलंदाज म्हणून केली होती. मी अष्टपैलू होण्याचा कधीच विचार केला नव्हता. कारण जेव्हा मी सलामीवीर म्हणून फलंदाजी करायला सुरुवात केली, तेव्हा मी पूर्णपणे फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. विशेषतः कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून खेळणे हे खूप आव्हानात्मक असते.”

माजी क्रिकेटपटू पुढे म्हणाला, “जर तुम्ही कसोटी क्रिकेटबद्दल बोलत असाल, तर मला वाटत नाही जे सलामीचे फलंदाज होते, ते अष्टपैलू देखील होते. हे एक विशेष काम आहे. कल्पना करा की तुम्हाला १५०-१६० षटके क्षेत्ररक्षण करावे लागेल आणि काही षटके टाकावी लागतील. नंतर १० मिनिटे ब्रेक घेतल्यानंतर तुम्हाला सलामीला फलंदाजीसाठी यावे लागेल. अशा वेळी शरीराची रिकव्हरी पहिल्यासारखी नसते आणि मानसिक कौशल्ये देखील पहिल्यासारखी नसतात.”

Story img Loader