Border Gavaskar Trophy History: भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ यांच्यात प्रतिष्ठित बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धा येत्या २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. ५ कसोटी सामन्यांच्या या मालिकेतील पहिला सामना पर्थ क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. दुसरा सामना ॲडलेडमध्ये, तिसरा सामना ब्रिस्बेनमध्ये, चौथा मेलबर्नमध्ये आणि शेवटचा सामना सिडनीमध्ये होणार आहे. याचबरोबर दुसरा कसोटी सामना हा पिंक बॉल कसोटी सामना असणार आहे. पण हा कसोटी सामना कधीपासून सुरूवात झाला आणि या ट्रॉफीला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी नाव का पडलं, जाणून घेऊया.

गेल्या काही वर्षांमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या रोमांचक सामन्यांनी क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. जसजसा काळ पुढे सरकत गेला तशी या दोन्ही संघांमधील ही स्पर्धा अधिक अटीतटीची होत गेली. या कसोटी मालिकेला १९९६ मध्ये सुरूवात झाली आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी असे नाव देण्यात आले. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत आतापर्यंत एकूण ५६ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये भारताचा संघ कायमच वरचढ राहिला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २४ सामने जिंकले आहेत, २० सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत आणि १२ सामने अनिर्णित राहिले आहेत.

Maharashtra Kesari Wrestling Tournament Winner Prithviraj Mohol Reaction on shivraj rakshe
होय शिवराज राक्षेची एका बाजूची पाठ नक्कीच टेकली होती : पृथ्वीराज मोहोळ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
SL vs AUS Australia beats Sri Lanka to record 3rd biggest away win in Test cricket after 23 years at Galle
SL vs AUS : ऑस्ट्रेलियाचा २३ वर्षांनंतर ऐतिहासिक विजय! कसोटी क्रिकेटमध्ये नोंदवला तिसरा सर्वात मोठा विजय
Ranji Trophy 2025 Mumbai defeated Meghalaya by an innings and 456 runs
Ranji Trophy 2025 : मुंबईचा मेघालयवर दणदणीत विजय; ८ विकेट्स आणि ८४ धावांसह शार्दूल ठाकूरचे महत्त्वपूर्ण योगदान
Ranji Trophy 2025 Yashasvi Jaiswal Shreyas Iyer Shivam Dube flop in Mumbai vs Jammu Kashmir match
Ranji Trophy 2025 : यशस्वी-श्रेयस आणि शिवम दुबे सलग दुसऱ्या डावात अपयशी, जम्मू-काश्मीरच्या गोलंदाजांपुढे टेकले गुडघे
Ranji Trophy 2025 Rohit Sharma suffers twin failure on Ranji return gets out for 28 in 2nd innings Mum vs JK match
Ranji Trophy 2025 : रोहित शर्मा रणजी ट्रॉफीच्या सलग दुसऱ्या डावात अपयशी, हिटमॅनचा झेलबाद झाल्याचा VIDEO व्हायरल
Indian Players Ranji Trophy 2025
Ranji Trophy: रणजी सामन्यांना ग्लॅमर; टीम इंडियाच्या शिलेदारांचा घाऊक सहभाग
Ranji Trophy Indian Players Rohit sharma rishabh pant fail in 1st Match
Ranji Trophy: टीम इंडियाचे स्टार घरच्या मैदानावरही नापास; गिल, पंत, यशस्वी एकेरी धावा करुन तंबूत

हेही वाचा – Gautam Gambhir: “पॉन्टिंगचा भारतीय क्रिकेटशी काय संबंध? त्याने तर…”; रोहित-विराटबद्दल केलेल्या वक्तव्यावर गंभीर संतापला

बॉर्डर-गावस्कर मालिकेला कधीपासून सुरूवात झाली?

१९९६ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) या दोन्ही क्रिकेट बोर्डांनी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि ऑस्ट्रेलियाचे ॲलन बॉर्डर यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू केली. बॉर्डर आणि गावस्कर हे दोन खेळाडू आपापल्या संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारे पहिले क्रिकेटपटू होते आणि हा विक्रम त्यांच्या नावावर दीर्घकाळ कायम होता.

हेही वाचा – Gautam Gambhir on KL Rahul: “केएल राहुलसारखे खेळाडू किती देशात आहेत?”, गौतम गंभीरचे मोठे वक्तव्य, नेमकं काय म्हणाला?

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत आतापर्यंत १६ मालिका खेळवल्या गेल्या आहेत. भारतात ९ वेळा आणि ऑस्ट्रेलियात ७ वेळा या मालिकांचे आयोजन करण्यात आले आहे. भारताने १० मालिका जिंकल्या असून ऑस्ट्रेलियाने ५ मालिका जिंकल्या आहेत. २००३-०४ मध्ये खेळवली गेलेली ही कसोटी मालिका अनिर्णित राहिली, जी मालिका ऑस्ट्रेलियामध्ये खेळवली गेली होती.

हेही वाचा – IND vs SA: “आता उभा राहून मजा बघ…”, हार्दिक पंड्याला मोठेपणा करणं पडलं भारी, अर्शदीपला बोललेल्या वाक्यानंतर होतोय ट्रोल

बॉर्डर गावस्कर मालिकेत भारताचा दबदबा

ऑस्ट्रेलियाने २०१४ मध्ये भारताला अखेरच्या वेळेस कसोटी मालिकेत पराभूत केले होते. त्यानंतर भारताने पुढील ४ बॉर्डर-गावस्कर मालिकेवर आपले नाव कोरले आहे. २०१७ मध्ये भारताने घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा २-१ असा पराभव केला होता. यानंतर, २०१८-१९ मध्ये, त्यांनी ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर २-१ ने मालिका जिंकली. त्यानंतर २०२०-२१ मध्ये भारताने पुन्हा ऑस्ट्रेलियन भूमीवर मालिका जिंकली. भारताने शेवटची मालिका २-१ ने २०२३ मध्ये जिंकली होती.

Story img Loader