देशांतर्गत क्रिकेटचे नियंत्रण करणाऱ्या बीसीसीआयला आता माहिती अधिकाराच्या कक्षेत आणावे, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांनी व्यक्त केले. बीसीसीआयच्या भवितव्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा लागणे हे दुर्दैवी आहे, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले.
‘सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात आनंद व्यक्त करण्यासारखे काहीच नाही. ज्या पद्धतीने खेळाला बदनाम करणाऱ्या गोष्टी समोर आल्या त्याने ते विषण्ण करणारे होते. कोणा व्यक्तीसाठी नाही तर खेळाचे झालेले नुकसान व्यथित करणारे आहे. हे सगळे टाळण्यासाठी बीसीसीआयला माहिती अधिकाराच्या कक्षेत आणणे अत्यावश्यक आहे. बीसीसीआयच्या संलग्न संघटनांनाही हा नियम लागू व्हावा,’ असे बेदी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, ‘या सगळ्यासाठी बीसीसीआयच कारणीभूत आहे. गोष्टी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाईपर्यंत बीसीसीआयने पावले का उचलली नाहीत, हा खरा प्रश्न आहे. बीसीसीआयचे पदाधिकारी खुर्ची सोडायला तयार नाहीत. पैसा हेच सगळ्याचे मूळ आहे. या सगळ्यामुळे क्रिकेटचे अपरिमित नुकसान
झाले आहे.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा