रांची : कसोटीसारख्या कठीण क्रिकेट प्रारूपात सहजासहजी संधी मिळत नसते. यशासाठी जे खेळाडू भुकेलेले असतात त्यांच्यासाठी संधी वाट बघत असते, अशा शब्दांत भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना जिंकल्यानंतर भारतीय संघात प्रवेश मिळविण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सर्व खेळाडूंना कडक इशारा दिला.

इंग्लंडविरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकून भारताने मायदेशात सलग १७ कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली. विजयानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोहितने सर्फराज खान, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल आणि आकाश दीप या प्रत्येक युवा खेळाडूने दिलेल्या योगदानाचे कौतुक केले आणि त्याच वेळी आपल्याला संघ कसा असावा याविषयी स्पष्ट मतप्रदर्शन केले.

India Beat England by 150 Runs in 5th T20I Abhishek Sharma Century Mohammed Shami 3 Wickets
IND vs ENG: एकट्या अभिषेक शर्माने इंग्लंडला हरवलं; इंग्लिश संघाचा टी-२० मधील सर्वात वाईट पराभव; १०० धावांच्या आत ऑल आऊट
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
India Beat England by15 Runs and Wins T20I Series
IND vs ENG: पुण्यनगरीत टीम इंडियाने कमावलं मालिका विजयाचं पुण्य; तिसऱ्या टी२० सामन्यात विजयासह विजयी आघाडी
Hardik Pandya Shivam Dube Partnership Record with Fifty for 6th Wicket IND vs ENG 4th T20I
IND vs ENG: हार्दिकचा नो-लूक षटकार तर शिवम दुबेचं दणक्यात पुनरागमन; दुबे-पंड्याने अर्धशतकांसह भारतासाठी रचली विक्रमी भागीदारी
India vs England 4th T20 Highlights in Marathi
India vs England 4th T20I Highlights: हर्षित राणाच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने घडवला इतिहास, सलग पाचव्या टी-२० मालिकेत इंग्लडला चारली धूळ
England Beat India by 26 Runs Varun Chakravarthy Fifer Ben Duckett fifty IND vs ENG
IND vs ENG: टीम इंडियाची हुकली विजयाची हॅट्ट्रिक! इंग्लंडचं टी-२० मालिकेत दणक्यात पुनरागमन; वरूण चक्रवर्तीच्या कामगिरीवर फेरलं पाणी
India vs England 3rd T20 Highlights Updates in Marathi
India vs England T20 Highlights : टीम इंडियाची हुकली हॅट्ट्रिक! राजकोटमध्ये इंग्लंडने मिळवला विजय, बेन डकेटने झळकावले अर्धशतक
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा

हेही वाचा >>>Ranji Trophy : मध्य प्रदेशची सलग तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत धडक! कर्नाटकला २६८ धावांची गरज, तर मुंबईकडे ४१५ धावांची आघाडी

‘‘ज्या खेळाडूंना आपली कामगिरी दाखवायचीच नाही अशा खेळाडूंचा संघ व्यवस्थापन कधीच विचार करणार नाही. जर, खेळाडूंमध्ये यशाची भूक नसेल आणि त्यांना काहीच करायचे नसेल, तर त्यांना संघात घेऊन काय करायचे आहे,’’असे स्पष्ट मत रोहितने मांडले.

आपली लय सिद्ध करण्यासाठी रणजी स्पर्धेत खेळण्याचा ‘बीसीसीआय’चा सल्ला धुडकावणाऱ्या श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांच्या भूमिकेनंतर रोहितने सोमवारी दिलेल्या इशाऱ्याला खूप महत्त्व येते. ‘‘ज्या खेळाडूला यशाची भूक नाही तो खेळाडू मला संघात नको आहे. जे संघात आहेत आणि जे नाहीत त्या सर्वानी या गोष्टीकडे गांभीर्याने बघावे. आधीच कसोटी क्रिकेटमध्ये खूप कमी संधी मिळतात आणि मिळालेल्या संधीचा फायदा घ्यायचा नसेल, तर संघापासून दूर राहा,’’असा कडक इशारा रोहितने दिला.

रणजी करंडक स्पर्धेत खेळण्याचे सोडून किशन मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांडय़ासोबत नुकताच बडोद्यात ‘आयपीएल’चा सराव करताना आढळून आला. ‘आयपीएल’सारख्या लीग युवा खेळाडूंना कसोटी क्रिकेटपासून दूर नेत आहेत का असे विचारल्यावर रोहितने कुणाचेही नाव घेतले नाही. पण, कसोटी क्रिकेट हे कठीण आहे. तेथे खेळण्यासाठी तुम्हाला झोकून द्यावे लागते. संधी मिळाल्यावर ती तुम्ही टिकवून ठेवण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, तर काही एक उपयोग नाही. येथे तुम्हाला खेळावेच लागते. संघ व्यवस्थापानाने संघ कसा असावा हे निश्चित केले आहे. त्यात बदल होत नाही, असे रोहित म्हणाला.

Story img Loader