टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हाच टीम इंडियाचा बॉस आहे. खेळाडू म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केले आहेच शिवाय एक माणूस म्हणूनही तो विचारांनी पक्का आणि परिपक्व झाला असे गौरवोद्गार टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काढले आहेत. विराट टीम इंडियाचा कर्णधार आहे. मी त्याला संघ कसा चांगल्या प्रकारे खेळ करेल याचे सल्ले देऊ शकतो मात्र त्याने माझे सगळे ऐकलेच पाहिजे यासाठी मी आग्रही नाही. आम्हा दोघांमध्ये विश्वासाचे नाते तयार झाले आहे. क्रिकेट जागतिक स्तरावर लोकप्रिय खेळ आहे यात टीम इंडियाची कामगिरी अधिकाधिक कशी चांगली होईल हे पाहणे आम्हा दोघांचेही काम आहे. आम्ही समन्वयाने काम करतो आहोत याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे असेही रवी शास्त्री यांनी म्हटले आङे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा