इशांत शर्माचे तीन बळी गुरुवारी भारतासाठी महत्त्वाचे ठरले. त्याच्या भेदक माऱ्याच्या बळावर भारताने उपांत्य फेरीत श्रीलंकेला हरवून अंतिम फेरी गाठली, परंतु इशांत स्वत:ला वेगवान माऱ्याच्या नेतृत्वस्थानी मानत नाही. सांघिक कामगिरीमुळे हा विजय मिळाल्याचे त्याचे म्हणणे आहे.
गुरुवारी भारताने श्रीलंकेवर आठ विकेट राखून आरामात विजय मिळवला आणि रविवारी इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या अंतिम सामन्यातील स्थान निश्चित केले. इशांत ३३ धावांत ३ बळी घेत सामनावीर किताब पटकावला. सामन्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना इशांत म्हणाला की, ‘‘खेळपट्टी अतिशय वेगवान होती आणि चेंडूला छान उसळी मिळत होती. मला योग्य लय सापडली आणि चांगली गोलंदाजी केली, याचा मला आनंद होतो आहे. योग्य टप्प्यावर चेंडू टाकणे, हे महत्त्वाचे असते. मला ते शक्य झाले, याबद्दल मी स्वत:ला नशीबवान समजतो.’’
तो पुढे म्हणाला, ‘‘दररोज अशा प्रकारे उत्तम गोलंदाजी करायला, मी देव नाही. आम्ही फक्त एकमेकांच्या मदतीने आणि आमच्या गोलंदाजीच्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली आपले कार्य चोख बजावतो आहे. याचप्रमाणे पाच क्षेत्ररक्षक वर्तुळात असताना गोलंदाजी करणे आव्हानात्मक असते, याची आम्हाला जाणीव होती. त्यामुळे आम्ही वैविध्य आणि अन्य गोष्टींवर मेहनत घेतली होती. परंतु त्याचे फळ आम्हाला मिळाले.’’
उंच वेगवान गोलंदाज इशांतने सांघिक कामगिरीला श्रेय देताना सांगितले की, ‘‘कामगिरी चांगली झाली, ही भावना खूप सुखावणारी असते. मी स्वत:ला वेगवान गोलंदाजीचा कर्णधार मानत नाही. कारण एक संघ म्हणून आम्ही सर्वानी अतिशय मेहनत घेतली आहे. भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादवने आपल्यापरीने सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे. ही सांघिक जबाबदारी असते.’’

India Beat England by 150 Runs in 5th T20I Abhishek Sharma Century Mohammed Shami 3 Wickets
IND vs ENG: एकट्या अभिषेक शर्माने इंग्लंडला हरवलं; इंग्लिश संघाचा टी-२० मधील सर्वात वाईट पराभव; १०० धावांच्या आत ऑल आऊट
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
India Beat England by15 Runs and Wins T20I Series
IND vs ENG: पुण्यनगरीत टीम इंडियाने कमावलं मालिका विजयाचं पुण्य; तिसऱ्या टी२० सामन्यात विजयासह विजयी आघाडी
We always learn from a T20I Game Says Suryakumar Yadav after defeat against England in 3rd T20I
IND vs ENG : ‘…म्हणून पराभव पदरी पडला’, सूर्यकुमार यादवने सांगितला राजकोट सामन्यातील टर्निंग पॉइंट
IND vs ENG Tilak Varma reveals Head Coach Gautam Gambhir advice after Chennai T20I win
IND vs ENG : ‘काहीही झालं तरी…’, तिलक वर्माने विजयानंतर गौतम गंभीरने दिलेल्या गुरुमंत्राचा केला खुलासा
Tilak Verma and Suryakumar Yadav victory celebration video goes viral after India won Chepauk
Tilak Verma : तिलकच्या वादळी खेळीने जिंकलं सूर्याचं मन, वाकून सलाम करतानाचा VIDEO होतोय व्हायरल
Tilak Varma Scores Most T20I Runs in Between Two Dismissals Broke Mark Chapman Record
IND vs ENG: तिलक वर्माने घडवला इतिहास, टी-२० मध्ये नाबाद राहत केल्या इतक्या धावा; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला फलंदाज
Arshdeep Singh Becomes Most Wicket taker in T20I India Bowler IND vs ENG 1st T20I
IND vs ENG: अर्शदीप सिंगने घडवला इतिहास, टी-२० मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा पहिला गोलंदाज
Story img Loader