भारत आणि पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी असले तरी त्यांच्यामधील सलोख्याचा मार्ग २२ यार्डातून जातो, असे म्हटले जाते, याचाच पुनर्उच्चार पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने केलो. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध क्रिकेटमुळे सुधारू शकतात, असे त्याने म्हटले आहे.
‘‘‘भारत व पाकिस्तान यांच्यातील सामने नेहमीच चुरशीचे होत आले आहेत. भारतामध्ये मी जेवढा क्रिकेटचा आनंद उपभोगला, तसा आनंद अन्य कुठेही मिळाला नाही. आम्हा दोन शेजाऱ्यांमधील नाते सलोख्याचे असायला हवे. फक्त क्रिकेटमुळेच हे नाते अधिक चांगले होऊ शकते,’’ असे आफ्रिदी म्हणाला.
आयपीएलमध्ये पाकिस्तानच्या खेळाडूंचा समावेश पाहायला मिळत नाही, याबाबत आफ्रिदी म्हणाला की, ‘‘तुम्ही हा प्रश्न मला विचारू नका, हा प्रश्न तुम्ही भारतीय सरकारला विचारायला हवा.’’
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 07-03-2014 at 05:21 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricket can bring improvement in indo pak ties shahid afridi