करूया उद्याची बात
१ जानेवारी २०१३- क्रीडा
खेळ म्हटला की त्यामध्ये जय आणि पराजय आलाच, पण या वर्षी भारताला ऑलिम्पिकच्या पदकांचा अपवाद वगळता जास्त आनंदाचे क्षण वाटय़ाला आलेच नाही. क्रिकेट, हॉकी आणि यांसारख्या अन्य खेळांमध्येही भारताच्या पदरी बहुतांशी निराशाच पडली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाने भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर बंदी घालणं हे भारतासाठी नक्कीच लज्जास्पद ठरलं, त्याचबरोबर अन्य खेळांच्या संघटनेतील सावळा गोंधळ पाहता अन्य संघटनांचेही काही खरे दिसत नाही. यामुळे देशाची लक्तरे वेशीवर टांगली आहेत, तर यामुळे मोठे नुकसान खेळ आणि खेळाडूंचे होणार आहे. २०१२ हे वर्ष भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी नक्कीच चांगले गेले नाही, पण रात्रीच्या गर्भात उद्याचा उष:काल असतो, असे म्हणतात. त्यानुसार हे दिवसही जातील आणि प्रमाणिक योगदान दिल्यास चांगले दिवसही आगामी वर्षी आपल्याला अनुभवायला मिळू शकतील.
आता दिवस-रात्र कसोटी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) घेतलेल्या निर्णयानुसार कसोटी क्रिकेटमध्ये बदल करण्यात येणार असून आता दिवस-रात्र कसोटी सामन्याचा आनंद प्रेक्षकांना लुटता येणार आहे. यापूर्वी इंग्लंडविरुद्ध कोलकाता येथील इडन गार्डन्समध्ये झालेल्या सामन्यामध्ये काही प्रमाणात हा प्रयोग करण्यात आला होता. हा प्रयोग यशस्वी झाला तर कसोटी क्रिकेटची रंजकता आणखी वाढायला मदत होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा