Team India batting order: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाला सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. या दोन दिग्गजांच्या अनुपस्थितीत, भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध पूर्ण ५० षटकेही खेळू शकला नाही आणि केवळ ४०.५ षटकांत १८१ धावांत आटोपला. वेस्ट इंडिजने चार विकेट्स गमावून लक्ष्य गाठले आणि १० सामन्यांमध्ये पहिला विजय मिळवला.

भारताच्या लाजिरवाण्या पराभवानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, ज्यांची उत्तरे टीम इंडियाला वर्ल्डकपपूर्वी शोधावी लागणार आहेत. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वन डे मालिकेतील पहिल्या सामन्यात ११५ धावांचा पाठलाग करताना रोहित आणि विराट फलंदाजीला आले नाहीत आणि टीम इंडियाने पाच विकेट्स गमावल्या. अशा परिस्थितीत सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन रोहितने सामना संपवला. रोहित आणि विराटशिवाय भारतीय वन डे संघ कमकुवत आहे, हे या दोन सामन्यांवरून स्पष्ट झाले आहे. त्याचवेळी टीम इंडियासाठी चौथ्या क्रमांकाची समस्या अजूनही कायम आहे.

IND vs ENG Gautam Gambhir played a master stroke as Harshit Rana to beat England Pune T20I match
IND vs ENG : गौतम गंभीरच्या मास्टर स्ट्रोकमुळे भारताने मारली बाजी! ‘हा’ निर्णय ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Hardik Pandya Shivam Dube Partnership Record with Fifty for 6th Wicket IND vs ENG 4th T20I
IND vs ENG: हार्दिकचा नो-लूक षटकार तर शिवम दुबेचं दणक्यात पुनरागमन; दुबे-पंड्याने अर्धशतकांसह भारतासाठी रचली विक्रमी भागीदारी
IND vs ENG Michael Vaughan slams Suryakumar Yadav for poor outing against England in T20I series
IND vs ENG : ‘तुम्ही प्रत्येक चेंडूवर बाऊंड्री मारु शकत नाही…’, इंग्लंडच्या माजी खेळाडूचा सूर्यकुमार यादवला सल्ला
Hardik Pandya knock put pressure on other India batters say Parthiv Patel after Team India defeat against England
IND vs ENG : ‘त्याच्या संथ खेळीमुळे इतर फलंदाजांवर दबाव वाढला,’ माजी खेळाडूने भारताच्या पराभवाचे खापर हार्दिकवर फोडले
IND vs ENG Tilak Varma reveals why he targeted England best bowler Jofra Archer in Chepauk T20I Match
IND vs ENG : तिलक वर्माने जोफ्रा आर्चरला का केलं होतं लक्ष्य? सामन्यानंतर स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘जेव्हा विकेट…’
Sanju Samson Scored 22 Runs in an Over Against Gus Atkinson Hit 5 Boundaries Watch Video
IND vs ENG: ४,४,६,४,४ संजू सॅमसनने इंग्लंडच्या हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाची केली धुलाई; एका षटकात कुटल्या २२ धावा
IND vs ENG 1st T20I Abhishek Sharma equals Yuvraj Singh record by scoring fastest fifty in 20 balls at home for India
IND vs ENG : अभिषेक शर्माचा मोठा पराक्रम! वादळी खेळीच्या जोरावर युवराज सिंगच्या ‘या’ विक्रमाची केली बरोबरी

हेही वाचा: ENG vs AUS: वॉर्नर-ख्वाजाची दमदार शतकी भागीदारी! पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलिया ड्रायव्हिंग सीटवर, विजयासाठी केवळ २४९ धावांची गरज

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने अक्षर पटेलला चौथ्या क्रमांकावर संधी दिली, मात्र तो एक धाव काढून बाद झाला. सूर्यकुमार यादव मधल्या फळीतही सातत्याने अपयशी ठरत आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा माजी क्रिकेटर सलमान बट्टने भारताच्या समस्येवर तोडगा काढला आहे. शिखर धवनने भारतीय संघात पुनरागमन करावे, असे त्याचे म्हणणे आहे. त्याने गिलसोबत डावाची सुरुवात केली. रोहित तिसऱ्या क्रमांकावर आणि विराट चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. यानंतर हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा आणि यष्टिरक्षक इशान किशन फलंदाजीला आले. यामुळे टीम इंडियाची बॅटिंग ऑर्डर मजबूत होईल.

बट्टने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर सांगितले की, “स्पष्टपणे मला असे जाणवते आहे की, विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळले नाहीत तर टीम इंडियाचा इतर कुठलाही फलंदाज त्यांच्या अनुपस्थितीत जबाबदारी उचलू शकत नाही. या दोघांची अनुउपस्थिती संघाला स्पष्टपणे जाणवते आहे. यापूर्वी जेव्हा धोनी आणि इतर प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात यायची, तेव्हा त्यांच्या अनुपस्थितीत सुरेश रैना, गौतम गंभीर किंवा युवराज सिंग फलंदाजीची जबाबदारी सांभाळत असत. पण सध्याचे खेळाडू एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्वत:ला प्रस्थापित करू शकलेले नाहीत. त्यामुळे विश्वचषकापूर्वी भारताला हा तिढा सोडवावा लागेल.”

हेही वाचा: Stuart Broad: स्टुअर्ट ब्रॉडने युवराज सिंगच्या सहा षटकारांवर सोडले मौन; म्हणाला, “आज जो मी…”

माजी सलामीवीर बट्ट तो पुढे म्हणाला, “मला वाटते की ज्या पद्धतीने एकदिवसीय सामने खेळले जातात, जर नवीन खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करू शकले नाहीत, तर शिखर धवन आणि शुबमन गिल या जोडीला तुम्ही सलामीला पाठवू शकतात. त्यानंतर कदाचित विराटसोबत रोहित शर्मा तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर येऊ शकेल. कोहलीनंतर सूर्यकुमार आणि के.एल. राहुल सारखे इतर खेळाडू असू त्याला साथ द्यायला येऊ शकतात. सध्याच्या भारतीय संघात ३-४ खेळाडू आहेत जे सलामीवीराची भूमिका बजावतात. मात्र, जेव्हा हेच खेळाडू मधल्या फळीत फलंदाजी करतात तेव्हा त्यांची कामगिरी खालावते. त्यात अनेकवेळा बदल झालेले आपण पाहिले आहे.”

Story img Loader